शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:56 IST

chiplun, nagarpalika, muncipaltycarporation, ratnagirinews शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रेनगर परिषदेने शोधला अतिक्रमणांवर जालीम उपाय

अडरे : शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.

शहरातील वाढते अतिक्रमण पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबवून खोके, हातगाड्या, शेड आणि काही बांधकामे जमीनदोस्त केली. याला व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाने आपली ही मोहीम सुरूच ठेवली. काही दिवसांनी शहरातील भोगाळे ते बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण झाले.

याठिकाणी अनधिकृत खोके आणि हातगाड्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला आवश्यक तेवढी जागा सोडून थेट पत्रे ठोकून अतिक्रमणाला पायबंद घालण्याची मोहीम शनिवारी हाती घेण्यात आली. अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, विनायक सावंत यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकून जागा आरक्षित करण्यास सुरुवात केली.

यावेळी सुरुवातीला व्यापाऱ्यांचा काहीसा विरोध झाला. परंतु, ही व्यवस्था व्यावसायिकांच्याही सोयीची असल्याचे टोपरे यांनी पटवून दिल्यानंतर विरोध मावळला. पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यावसायिकांना व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याबाहेर कोणालाही व्यापार करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहितीही टोपरे यांनी दिली.

चिपळूण नगर परिषदेने हाती घेतलेल्या या मोहिमेचा सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ता मोकळा राहणार असून, वाहतुकीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच फेरीवाले व व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडून नगर परिषदेच्या या मोहिमेचे स्वागत केले जात आहे. भोगाळे ते बसस्थानक बुरुमतळी या मुख्य रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकण्याची मोहीम शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांकडून राबवली जात होती.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी