शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST

बांधकाम, महावितरणवर आगपाखड : इकोसेन्सिटिव्ह गावे वगळण्याचा ठराव

देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या आमसभेत सोमवारी एस. टी., बांधकाम विभाग, महावितरण, कृषी, घरकुले, पाणीपुरवठा या विषयांवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली. महावितरण व बांधकामच्या काही अधिकाऱ्यांना धारेवर धरत इको सेन्सिटिव्हमधील गावे वगळण्यात यावीत, असा ठराव आमसभेमध्ये मंजूर करण्यात आला.तीन तास चाललेल्या आमसभेमध्ये अनेकांना आपले प्रश्न मांडता आले नाहीत. तसेच महत्त्वाचे प्रश्न चर्चिले न गेल्याने नाराजी व्यक्त करीत सभा गुंडाळण्यात आल्याची भावना काहींनी सभागृहात बोलून दाखविली. ही आमसभा यापूर्वी दोनवेळा रद्द झाली होती. सभेमध्ये प्रथम एस. टी. या विभागापासून चर्चा करण्यात आली. यावेळी हल्ली एस. टी.मध्ये नव्याने भरती झालेल्या चालकांच्या वेगावर लगाम लावला पाहिजे, अशी मागणी विजय पांचाळ यांनी केली. तसेच अनेकांनी बसफेऱ्यांच्या अनियमिततेबाबत एस. टी. सुरु करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. एसटीवर अनेक प्रश्न असल्याने आ. चव्हाण यांनी आगार व्यवस्थापक यांना गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्या, असेही सुचित केले.याबरोबरच महावितरणच्या वर्षानुवर्षे गंजलेला पोलचा प्रश्न जैसे थे असल्याचे बोरुकर व गुरव यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आदेशाने एखादे काम तीन दिवसात होते, तर अन्य कामांना का इतका वेळ लागतो, असे खडे बोल आमदार चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच गंजलेले पोल प्राधान्याने बदलण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्ते उखडलेले असताना अधिकाऱ्यांकडून चालढकल होताना दिसत असल्याने सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता यांना आ. चव्हाण यांनी धारेवर धरत तुम्ही स्थानिक आहात तरीदेखील तुम्ही असे का वागता? तुम्ही खोत झाले आहेत अशा कडक शब्दात सुनावले. तर युयुत्सू आर्ते यांनी फणसट धनगरवाडी येथील ३० लाख रुपये खर्चून केलेला रस्ता पळविला आहे, असे सभागृहात सांगत मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी खर्च कसा झाला, याबाबत चौकशीची मागणी आर्ते यांनी केली. यापुढे तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम काणे करते? असा सवाल भाई बोरुकर, छोट्या गवाणकर यांनी उपस्थित केला.कृषीमध्ये आलेल्या विषयांची तसेच आंगवली सोनारवाडीतील घरकुलांची चौकशी करण्यात यावी, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर गोळवली अंगणवाडी सेविका तसेच काही शिक्षक आपल्या शाळा सोडून पंचायत समिती आवारात फिरत असतात, त्यांची चौकशी व्हावी. याखेरीज धामणी बडदवाडी येथे २००७ मध्ये भारत निर्माणमधून पाणी पुरवण्याचे काम अद्यापही झालेले नाही, असे निदर्शनास आणून देत याकडे लक्ष देण्याची मागणी धामणीचे ग्रामस्थांनी केली.सभा आवरती घेतल्याने बावा चव्हाण, ललिता गुडेकर आदींना आपले प्रश्न आटोपते घ्यावे लागले. या सभेला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती मनीषा गुरव, उपसभाती संतोष डावल, नगराध्यक्ष स्वाती राजवाडे, उपनगराध्यक्ष मनीष सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकादम, विलास चाळके, वेदा फडके, माजी उपसभापती संतोष थेराडे, गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी, तहसीलदार वैशाली माने, युयुत्सू आर्ते, नीलम हेगशेट्ये, मुख्याधिकारी शिल्पा नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)