शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल अधिकारी-कर्मचारी महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरी भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता भारतभर मंगळवारी तीव्र आंदोलन केले. ...

रत्नागिरी : रत्नागिरी भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता भारतभर मंगळवारी तीव्र आंदोलन केले. यात रत्नागिरीतील बीएसएनएलचे सर्व अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते. दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविला.

बीएसएनएलची खालावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली पाहिजे, कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळत नाही, ते पुन्हा सुरळीत झाले पाहिजे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबली पाहिजे. बीएसएनएल फोर जी यंत्रणा तातडीने सुरू करून, बेसिक फोन सेवा, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा यांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे, तिसरा वेतन समीक्षा अहवाल लागू झाला पाहिजे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

नवी दिल्ली इथे ज्येष्ठ नेते जी. एल. जोगी, सबिस्तीन, कोळपकर आदींनी नेतृत्व केले, तर राज्य पातळीवर संचार निगम अधिकारी महासंघाचे महादेवराव अडसूळ, कोतंबे, दाणी, नलावडे आदींनी नेतृत्व केले.

सध्या बीएसएनएल वाईट संक्रमणामधून जात आहे. दोन वर्षे असलेले लॉकडाऊन, सरकारचे असलेले दुर्लक्ष, बीएसएनएलला मिळणारी सापत्न वागणूक, फोरजी सेवेला होणारा विलंब, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता, ठेकेदारी पद्धतीने होणारे निकृष्ट काम आदीबाबत प्रशासनास वेळोवेळी सांगूनही होणारे दुर्लक्ष, याचा दूरसंचार सेवेवर होणारा विपरीत परिणाम याकडे सरकारचे लक्ष वेधणे, हा प्रमुख उद्देश आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना तीन महिने वेतन नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते धोरण अवलंबिले पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केले, तर २८ तारखेला पुन्हा लाक्षणिक उपोषण केले जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा सचिव नंदकिशोर कदम यांनी दिली. या आंदोलनास राज्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे कदम यांनी सांगितले.

फोटो मजकूर

भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता रत्नागिरी येथील कार्यालयासमोर मंगळवारी तीव्र आंदोलन केले.