शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना नदीवरील पूल धाेकादायक, ३० गावांचा पाचलशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. ...

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. प्रशासनाबरोबरच राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही या दुर्घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे ३० गावांचा पाचल बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडली की, प्रशासन, लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गावर टाकून मोकळे होतात. जबाबदारीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. अर्जुना नदीचा पूल वाहून जाण्यास निसर्ग जबाबदार नसून प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केलेल्या मानवनिर्मित चुका व या पुलाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हा पूल वाहून गेल्याचे अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. सन २०१८मध्ये शासनातर्फे या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मनसेतर्फे हे काम थांबविण्यात आले होते. पुलाची डागडुजी नको तर नव्याने पूल बांधण्याची मागणी मनसेने शासनाकडे केली होती. मात्र, आमच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आमच्या मागणीची दखल घेऊन हा पूल नव्याने बांधला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे सौंदळकर यांनी सांगितले.

या भागातील ३० गावांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाला पर्यायी पूल शासनाने बांधायला हवा होता. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे जनतेला हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल सौंदळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाचल बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.