शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची आर्थिक मदत मिळविताना फसगत होणार नाही, याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मदत घोषित केली आहे. मात्र, ही ...

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मदत घोषित केली आहे. मात्र, ही मदत मिळविताना यातून रिक्षा व्यावसायिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने ही मदत मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करू नये किंवा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तीकडे आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे देऊ नयेत, अशा इशारा रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा-टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जिल्हा उपसंघटक अविनाश कदम यांनी दिला आहे.

कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प झाला आहे. मात्र, रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीची रक्कम परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांच्या थेट खात्यात जमा केली जाणार असून मदत मिळवून देतो, असे सांगून फसविण्याचे प्रकार होऊ शकतात.

सध्या शासन ऑटोरिक्षा चालकांना प्रत्यक्ष मदत कशी देता येईल, याबाबत विचार करीत असून त्यादृष्टीने सर्वेक्षण करीत आहे. जिल्हानिहाय परवानाधारकांच्या नावासह यादी तयार केली जात असून महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपापल्या जिल्ह्यातील परवानाधारक यांची नावासह माहिती घेऊन संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी हे राज्य परिवहन आयुक्त अर्थात शासनाचे प्रमुख सचिव यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करतील. त्यानंतर सरकार जिल्हानिहाय परवानाधारक यांची नावे जाहीर करील. त्यानंतर संबंधित ‘मदत वाटप कक्ष’ हे परवानाधारक यांचे ओळखपत्र , बँक खाते क्रमांक मागवून घेतील. त्यानंतर संबंधित रिक्षा व्यावसायिकाला १५०० रुपयांची आर्थिक मदत ही थेट परवानाधारकाच्या खात्यांवर टाकण्यात येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.

मात्र, या प्रक्रियेबाबत आपल्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक संधीसाधू लोक मदत मिळवून देण्याचे नाटक करून फसवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे आपली व्यक्तिगत माहिती इतर कुणालाही देऊ नका. यातून स्वतःची आणि इतरांचीही फसगत होण्याचा धाेका असल्याचे अविनाश कदम यांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन उपायुक्तांचीही सूचना

राज्यात काेरोनाच्या अनुषंगाने राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये सानुप्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. परंतु काही प्रतिनिधी-संघटना यांच्याकडून हाती फॉर्म भरून घेण्यात येत आहे, अशा तक्रारी या कार्यालयाकडे आल्या आहेत. परवानाधारक रिक्षा चालकांचे सानुग्रह अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. यासाठी कोणताही फॉर्म भरून देण्याची अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, असे परिपत्रक परिवहन उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनीही मंगळवारी काढले आहे.