शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाचे पाणी अडवून शेती

By admin | Updated: May 13, 2017 01:11 IST

तालुक्यात मेहनती शेतकरी आहेत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जिद्दीने मेहनत करण्याची तयारी असेल तर नाल्यामध्ये पाझरून आलेले

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात मेहनती शेतकरी आहेत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जिद्दीने मेहनत करण्याची तयारी असेल तर नाल्यामध्ये पाझरून आलेले पाणी अडवून देखील प्रयोगशील शेती करता येते हे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाथरज पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. तेथील १५ शेतकऱ्यांनी यावर्षी तब्बल १० लाख झाडांच्या रोपांची निर्मिती आपआपल्या रोपवाटिकेत केली आहे.कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा येथे पाझर तलाव असून त्या तलावाचे पाणी जमिनीत झिरपून खाली नाल्यातून वाहून जात असते. ते पाणी त्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधून अडविण्यात आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पर्यायी शेती करण्याची संधी मिळाली आहे. पाझर तलावातून पाझरून जाणाऱ्या पाण्याची क्षमता फार मोठी नाही, परंतु मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे हे डोंगरपाडा तलावाखाली शेती करणाऱ्या शेतक ऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पावसाळा संपला की हे सर्व शेतकरी करंज, बेहडा, काशिद, साग, आंबा, काजू, खैर, सीताफळ, कांचन, पेरू, बिब्बा, दंतपर्णी, चिंच, आवळा अशा प्रकारची झाडे यांची रोपे तयार करण्याचे काम आपल्या रोपवाटिकेत करण्यासाठी हे सर्व शेतकरी वाडा तालुक्यात जावून रोपे तयार करण्यासाठी बियाणे आणतात.डिझेल पंप लावून नाल्यातून पाणी उचलून रोपवाटिका शेती हे सर्व शेतकरी करीत असतात.त्यांचा थोडा त्रास कमी करण्याचे काम कर्जत तालुक्यातील मोठ्या संख्येने असलेले फार्महाऊस करीत असतात. त्यातच शासनाच्या योजनांप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हे ग्रामपंचायती यांना बंधनकारक करण्यात आल्याने या रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली १० लाख रोपे बहुसंख्येने विकली जातात. प्रामुख्याने जून महिन्यात म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून ९० टक्के रोपांची विक्र ी होते आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचे काम हे शेतकरी करीत असतात.पाथरज, डोंगरपाडा या गावातील भरत लोहकरे, प्रकाश सुपे, भास्कर इष्टे, रवींद्र मोडक, सुरेश केवारी, दिनेश केवारी, सीताराम केवारी, वामन लोहकरे, पुंडलिक लोहकरे, लक्ष्मीकांत दळवी, नामदेव वारघडे, अनंता पादिर, चांगो पादिर, चंद्रकांत ऐनकर, हरिश्चंद्र भोपी, भगवान इष्टे हे शेतकरी रोपवाटिका व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या या रोपे बनविण्याच्या कामाचा फायदा जिल्ह्याचा नैसर्गिक समतोल वाढण्यासाठी होत आहे, त्यामुळे हा नर्सरी व्यवसाय कर्जत तालुक्यातील मेहनती शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्तर वाढविणारा ठरला आहे.