शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:15 PM

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन । श्रीवर्धन येथील र. ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात सभा

श्रीवर्धन : सेना-भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत विविध कामांना चालना दिली आहे. आम्ही सत्तेत असूनसुद्धा अनेकदा जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारला विरोध केला. शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी के ले. श्रीवर्धन येथील र. ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. तर उरण मतदारसंघातही सभा घेत त्यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

या वेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत महाड विधानसभेवर भगवा फडकेलच; परंतु श्रीवर्धनसुद्धा भगवेमय झाले पाहिजे. शिवरायांच्या महाराष्ट्रातील रायगडवरील भगवा पुन्हा फडकला पाहिजे, असे उद्गार काढले. शिवसेनेने अभ्यासपूर्ण वचननामा तयार केला आहे. त्यामध्ये समाविष्ट सर्व बाबींची पूर्तता आम्ही करू, असे आश्वासन दिले. आज राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा लक्षात घेता शिवसेनेने आश्वासक भूमिका घेतली आहे. आगामी काळात लवकरच अयोध्येत राममंदिर बांधू, असे सांगून शिवसेना हिंदुत्वाचे समर्थन करते, त्याचसोबत देशावर प्रेम करणाऱ्या सर्व मुस्लीम समाजातील लोकांना शिवसेना आपली मानते. आज अनेक जाती-धर्माचे लोक शिवसेनेत आहेत. जाती-पातीचे राजकारण आम्ही कधी केले नाही व करणारसुद्धा नाही.

जनतेला दिलेल्या आश्वासनात एक रुपयात आरोग्य चाचणी व दहा रुपयांत सकस जेवणाची थाळी आम्ही लवकरच सुरू करू, असे अश्वासित केले. त्याचसोबत विरोधी उमेदवार भावनिक आवाहन करत आहे; परंतु त्याच्या कर्माची फळे त्यांना भोगावी लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रवीण दरेकर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019