शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये शिक्षकांकडूनच सर्व शिक्षा अभियानाला हरताळ, शिक्षकांची सोयीनुसार शाळेत हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:27 IST

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे; परंतु याकडे ना शाळा व्यवस्थापन समितीचे, ना शिक्षणविभागाचे लक्ष. शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांची वाट पाहून कंटाळलेले विद्यार्थी यामुळे शाळा ओस पडत असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यानुसार कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातदेखील शाळा आहेत. कर्जत तालुक्यातील अधिकांश भाग हा आदिवासीबहुल भाग आहे. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या शाळेत मुले आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण करतात. मुले म्हणजे कच्ची माती, या मातीला मडक्याला आकार देण्याचे काम त्यांचे गुरू करतात. मात्र, शाळेत शिक्षकच उशीरा येत असतील, तर ही परिस्थिती ओढवणारच आहे. कर्जत तालुक्यातील शाळेत शिक्षक वेळेवर जात नसल्याने तसेच ट्रेन मिळवण्यासाठी सायंकाळी लवकरच पळ काढत असल्याचे समोर आले आहे. अशा शिक्षकांवर लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षण विभागाचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सोमवारी कळंब ग्रामपंचायत हद्दीतील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही शिक्षक काम असल्याचे कारण सांगून उशिरा आले. तोपर्यंत कंटाळलेले अर्धे विद्यार्थी घरी निघून गेले, तर इतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर खेळ मांडला. तर नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथे दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षक गायब असल्याने विद्यार्थ्यांनीही वर्गातून पळ काढला होता. दुर्गम भागातील अशा अनेक शाळांमधील शिक्षक हे आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे उज्ज्वल भारत घडणार कसा? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तर जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत म्हणून घेत असलेली मेहनत वाया जात आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? काही शाळांमध्ये विद्यार्थी उशिरा आला तर शिक्षक त्यांना शिक्षा करतात. मग अशा सोईनुसार शाळेत येणाºया शिक्षकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्यांच्या स्तरावर अशा उशिरा येणाºया शिक्षकांवर भरारी पथके नेमून कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. तसा अहवाल आमच्याकडे द्यावा, त्यानुसार कारवाईचा निर्णय घेऊ.- नितीन मंडलिक, शिक्षणाधिकारी,प्राथमिक राजिपग्रामीण भागात शिक्षक शाळेत वेळेवर जात नसल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यानुसार पंचायत समितीमध्ये चर्चादेखील झाली आहे. त्यामुळे आम्ही भरारी पथके नेमून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आशा शिक्षकांवर कारवाई करणार आहोत.- धनसिंग राजपूत, प्रभारी गटशिक्षणाधिकारीआमच्या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय प्राथमिक शिक्षणाची सोय नसते. आमचे आदिवासी पालक गरीब असल्याने त्यांच्या मुलांना मोठ्या शाळेत घालू शकत नाहीत, म्हणून आमची सगळी मुले रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. मात्र, शिक्षक उशिरा शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. शिक्षण विभागाने वेळेत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.- जैतू पारधी,माजी अध्यक्ष,आदिवासी संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रKarjatकर्जतRaigadरायगड