शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:54 IST

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत.

गिरीश गोरेगावकर 
माणगाव : ‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. त्यामुळे प्रसन्न अशी पहाट होत असे. मात्र, काळानुरूप अशी पहाटही कालबाह्य झाली असे म्हणावे लागेल. कारण एकेकाळी जाते ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या आवाजानेच व्हायची. प्रत्येक घरी जाते असायचे. या जात्याची घरघर पहाटे सुरू व्हायची. त्यामुळे पूर्वी आपोआपच सारे गाव जागे व्हायचे व दळण दळताना पहाटेची गाणी, ओव्या, भुपाळ्या, भारुडे गाऊन धान्य दळले जात असे व उखळीतून धान्य सडून तांदूळ काढले जात असत.
पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब जीवनात जात्याला महत्त्व देत होते. किंबहुना ते एक महत्त्वाचे साधन होते. पूर्वी पहाटे जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या मुखातून अमृतमधुर ओव्या ऐकायला मिळायच्या. तसेच जाते चालविल्याने व उखळीतून धान्य सडल्याने चांगला व्यायामसुद्धा होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या युगातील उच्चशिक्षित महिला जुन्या गोष्टी अवलंबताना दिसत नाहीत. आता जात्यावरच्या त्या पारंपरिक ओव्या पुस्तकात बंद झाल्या आहेत.
पूर्वी गावोगावी लाइटची सोय नसायची. बाजाराच्या ठिकाणीच लाइटची सोय असल्याने पिठाच्या गिरणी व भात गिरणी बाजारात असायच्या. ग्रामीण भागात पिठाची गिरणी व भात गिरणी नसल्यामुळे आम्हाला जात्यानेच धान्य दळणे व उखळातून तांदूळ सडणे, अशी कामे भल्या पहाटे करावी लागत होती. आता सर्वच ठिकाणी पिठाच्या गिरण्या व भात गिरण्या उपलब्ध झाल्याने जाते व उखळ क्वचितच दिसतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक पिठाबाई खाडे यांनी दिली.