शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:54 PM

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत.

गिरीश गोरेगावकर माणगाव : ‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. त्यामुळे प्रसन्न अशी पहाट होत असे. मात्र, काळानुरूप अशी पहाटही कालबाह्य झाली असे म्हणावे लागेल. कारण एकेकाळी जाते ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या आवाजानेच व्हायची. प्रत्येक घरी जाते असायचे. या जात्याची घरघर पहाटे सुरू व्हायची. त्यामुळे पूर्वी आपोआपच सारे गाव जागे व्हायचे व दळण दळताना पहाटेची गाणी, ओव्या, भुपाळ्या, भारुडे गाऊन धान्य दळले जात असे व उखळीतून धान्य सडून तांदूळ काढले जात असत.पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब जीवनात जात्याला महत्त्व देत होते. किंबहुना ते एक महत्त्वाचे साधन होते. पूर्वी पहाटे जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या मुखातून अमृतमधुर ओव्या ऐकायला मिळायच्या. तसेच जाते चालविल्याने व उखळीतून धान्य सडल्याने चांगला व्यायामसुद्धा होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या युगातील उच्चशिक्षित महिला जुन्या गोष्टी अवलंबताना दिसत नाहीत. आता जात्यावरच्या त्या पारंपरिक ओव्या पुस्तकात बंद झाल्या आहेत.पूर्वी गावोगावी लाइटची सोय नसायची. बाजाराच्या ठिकाणीच लाइटची सोय असल्याने पिठाच्या गिरणी व भात गिरणी बाजारात असायच्या. ग्रामीण भागात पिठाची गिरणी व भात गिरणी नसल्यामुळे आम्हाला जात्यानेच धान्य दळणे व उखळातून तांदूळ सडणे, अशी कामे भल्या पहाटे करावी लागत होती. आता सर्वच ठिकाणी पिठाच्या गिरण्या व भात गिरण्या उपलब्ध झाल्याने जाते व उखळ क्वचितच दिसतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक पिठाबाई खाडे यांनी दिली.