शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:45 IST

भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग - भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोण कोठून लढणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असले, तरी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि शेकापचे आमदार धैर्यशील पाटील हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होऊन प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.युतीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप-शिवसेनेला १२० पेक्षा कमी जागा देण्याची तयारीत असल्याने शिवसेना स्वाभिमान बाजूला ठेवण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचेच चित्र त्यानिमित्ताने दिसून येते. युती न झाल्याचा परिणाम राज्यात होत असताना रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागांवर त्याचा प्रभाव पडत आहे. युतीची घोषणा न झाल्याने काही ठिकाणच्या जागेवर कोण लढणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत शेकाप आहे. मात्र, अलिबागमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा केला जाणार असल्याने अलिबाग वगळता अन्य ठिकाणी ही आघाडी असल्याचे चित्र दिसू शकते.निवडणूक विभागाने आपल्या बाजूने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र, निवडणुकीच्या मांडवात ज्यांची लग्न लागणार आहेत, त्यांचीच नावे समोर आलेली नसल्याने जनतेच्या मनातील कुतूहल वाढले आहे.२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्याप प्रमुख पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे दिसत नाही. सोमवार, ३० तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.युती-आघाडी यांचा सावळागोंधळ सुरू असताना दुसरीकडे पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, महाडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि पेणमधील शेकापचे धैर्यशील पाटील यांचे विधानसभेचे तिकीट पक्के समजले जात असल्याने ते सर्व हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.१आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, सुरेश लाड आणि धैर्यशील पाटील हे २००९ आणि २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून ते हॅट्ट्रिक साधतील, अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. हॅट्ट्रिक साधण्यासाठी त्यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे युती अथवा आघाडीची वाट न बघता यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते.२प्रशांत ठाकूर हे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत, तर धैर्यशील पाटील हे शेकापच्याच तिकिटावर लढणार असल्याचे त्यांच्याच पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड हे नक्की कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर लढणार याबाबत मतदारसंघामध्ये अद्यापही उलटसुलट चर्चा आहे. मध्यंतरी त्यांनी याचा इन्कार करत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.उमेदवारांची अदलाबदलअद्यापही युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे युती झाली नाही तर उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते, असे एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. युती झाली नाही तर कोणत्या पक्षाचा उमेदवार कोठून लढणार याबाबत विचारले असता, दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असे त्याने उत्तर दिले. दरम्यान, युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता खरी ठरली, तर प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षातील तिकिटावर लढण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019