शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:25 AM

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि गादीचे वारस असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक तालुक्यातील गांगवली या जन्मगावामध्ये उभारले जावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावामध्ये महाराणी येसूबाईंच्या पोटी १८ मे, १६८२ या दिवशी थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.गांगवली गावच्या हद्दीत तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी, मोकाशीवाडी, खरबाचीवाडी अशा पूर्वापार वाडत्ता आहेत. कुंभारवाडीतून साळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुप्रसिद्ध वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणाºया वैपूर्णा नदीवर नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला फरसबंद नदीघाट आहे, तर पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. मंदिराच्या समोरच चिरेबंदी वाड्याच्या खाणाखुणा आजही दिसतात.छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाऱ्यांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो. परंतु अशा या ऐतिहासिक भूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी गांगवली येथील ग्रामस्थांकडून होत आहे. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देऊन संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आाहे. अनेक नागरिकांना या प्राचीन वास्तूबाबत माहिती नसल्याने येथे माहिती फलक लावावे. या वास्तूचे संवर्धन झाल्यास येथे पयटक नक्कीच भेट देतील.माणगावपासून राजधानी रायगडकडे जाणा-या मुख्य मार्गालगत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख असलेला साधा माहितीफलक दिसत नाही.माणगाव तालुक्यात जन्म घेतलेल्या थोरल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळ परिसरात पूर्णाकृ ती मूर्ती स्मारक बनवावे, तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतातछत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाºयांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो.माणगावच्या पावनभूमीत अनेक शूरवीरांचा जन्म1शिवकालीन चिरेबंदी वाड्यावरच सन १९८० मध्ये रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अक्षरश: ओसाड अवस्थेत आहे.2माणगावच्या पावनभूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर, पायदळप्रमुख येसाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रेंचे विश्वासू सरदार खंडोजी माणकर यांसारख्या शूरवीरांचा जन्म झाला आहे.3याचबरोबर अठराव्या शतकातील आशिया खंडातील सर्वात ताकदवान अजातशत्रू सम्राट असं परकीय इतिहासकारांनी गौरविलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान मात्र उपेक्षितच राहिले आहे. कुशल प्रशासक, धोरणी राजा आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती अशी ओळख असलेल्या महापुरुषांच्या जन्मगावात विदारक चित्र पाहायला मिळते .

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास