शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग किनाऱ्यावरील बंधारा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 02:06 IST

समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे.

आविष्कार देसाई 
अलिबाग : समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वाºयामुळे समुद्र खवळलेला होता. महाकाय लाटांपुढे त्याचा टिकाव लागला नसल्याने बंधाºयाचे तुकडे पडले आहेत. मध्येच बंधारा तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्याने बंधाºयावरील जॉगिंग ट्रॅक नाहीसा झाल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘क्यार’ चक्रिवादळापाठोपाठ ‘महा’ चक्रिवादळामुळे प्रचंड पाऊस झाला. सोसाट्यांच्या वाºयामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणाºया होड्या रत्नागिरी, रायगडसह अन्य बंदरांमध्ये नांगर टाकून विसावल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, तसेच वादळाचा भातशेतीसह काही प्रमाणात आंबा पिकालाही फटका बसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी वाºयामुळे अलिबाग समुद्रकिनारी बांधण्यात आलेला क्राँक्रीटचा बंधाराही वाहून गेला आहे. अलिबाग शहर हे समुद्राला लागून वसलेले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट शहरात घुसू नये, यासाठी बºयाच वर्षांपासून दरड टाकण्यात आली होती. कालांतराने तीही अत्यव्यस्थ झाल्याने उधाणाच्या कालावधीत आणि पावसाळ्यात समुद्राचे पाणी हे किनाºयावरून थेट शहरात घुसत होते. त्याचा फटका शास्त्रीनगर, कोळीवाडा, कस्टम कॉलनी, जेएसएम कॉलेजचे मैदान, अलिबागचा मेन बिच समोरील परिसर, क्रीडाभुवन त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीपर्यंतही पाणी जात होते.
तातडीने बंधाºयाची दुरस्ती करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी आपली मर्यादा ओलांडण्याची भीती असल्याने नव्याने बंधारा उभारणे गरजेचे होते. त्यानुसार प्रथम २००७ सालापासून कोळीवाडा (बंदर विभाग कार्यालय) ते जेएसएम कॉलेज या ठिकाणी बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. हा बंधारा पूर्वी ग्रोएन्स पद्धतीचा होता. त्यानंतर त्यामध्ये काही आवश्यक बदल सुचवून क्राँक्रीटचे ब्लॉक तयार करून त्याला लोखंडी जाळी बसवण्यात आली. बंधाºयाचे काम हे दोन टप्प्यांमध्ये केले होते. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च केला होता. २०१४-१५ या कालावधीत बंधाºयाचे काम पूर्ण झाले.
बंधारा बांधताना त्यावर क्राँक्रीट अंथरण्यात आले होते. त्यामुळे अलिबागकरांना चांगला जॉगिंग ट्रॅक उपलब्ध झाला होता. त्या ट्रॅकचा वापर मार्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने करण्यात येत होता. बंधारा झाल्याने अलिबागच्या समुद्रकिनाºयाला अनोखे वैभव प्राप्त झाले होते.
अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने पर्यटकांचीही चांगलीच सोय होत होती. त्याच बंधाºयावर नगरपालिकेने बसण्याची व्यवस्थाही केली आहे. तसेच व्यायामाचे साहित्यही उभारलेले आहे. त्यामुळे या बंधाºयामुळे सर्वांचीच सोय होत होती.
>तातडीने दुरु स्ती करण्याची मागणी
समुद्राच्या लाटांपुढे या बंधाºयाचा टिकाव लागला नाही. सीव्ह्यूू हॉटेल समोरील बंधारा सुमारे ३० मीटरपर्यंत तुटला आहे. त्यामुळे सर्व दगड वर आले असल्याने त्यावरून आता चालता येत नाही. वरचा बंधारा सध्या तरी सुस्थितीमध्ये असल्याने त्याचा वापर केला जात आहे; परंतु बंधाºयाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर सुस्थितीमध्ये असणारा वरील बंधाराही तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यांची तातडीने दखल घेऊन बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. बंधाºयावर बसून सायंकाळी पाण्यात बुडणारा तांबडा सूर्य पाहता येत होता. तसेच समुद्राला भरती असली की, या बंधाºयावरून फेरफटका मारता येत होता. अलिबागमधील प्रशासकीय यंत्रणा लवकरच या बंधाºयाची दुरुस्ती करेल, असे एका पर्यटकाने ‘लोकमत’ला सांगितले.