शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
3
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
4
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
5
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
6
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
7
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
8
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
9
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
10
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
11
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
12
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
13
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
14
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
15
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
16
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
17
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
18
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
19
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
20
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा

मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:27 IST

गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे

नम्रता फडणीस

पुणे : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनला असून, मुलांमधील हिंसा शाळेपर्यंत पोहोचली आहे. मुलांना सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्याचे मार्ग कळायला लागले असून, आसपासचे सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण, गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज या गोष्टी मुलांमधील हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी मांजरी येथील एका खासगी शाळेत वार्षिक संमेलनाच्या आयोजनातून वाद झाल्याचा राग मनात धरून नववीच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली. यामुळे मुलांमधील वाढत्या हिंसकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुले घरात असतात तोवर लक्ष ठेवणे शक्य आहे; पण समाजात वावरताना त्यांच्याशी कुणी चुकीचे वागले तर ते कसा प्रतिसाद देतील? त्याचे परिणाम काय होतील, याची आम्हालाही कल्पना नसते, असे पालकांचे म्हणणे आहे.

समाजात बेरोजगार मुले इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अल्पवयीन मुलांसमोर आदर्श घेण्यासारखे कुणी नसेल तर अशा मोठ्या वयाच्या मुलांचा आदर्श घेतला जातो, मुले त्यांचे अनुकरण करायला लागतात. अजूनही एक लक्षात न घेतलेली गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा मुलांना पॅकिंग फूड देण्याकडे कल वाढतोय. एखादी गोष्ट कुरकुरीत ठेवण्यासाठी ज्या कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. त्याचा मुलांच्या मेंदूवरही नकळत परिणाम होतोय. - डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

शाळेत एखाद्या मुलाचे बुलिंग होत असेल तर शांत असलेला मुलगा कधीतरी टोकाचे पाऊल उचलू शकतो. कित्येकदा किशोर वयात मुलांना भावना योग्य पद्धतीने हाताळता येत नाहीत. स्क्रीनच्या व्यसनामुळे मुलांमधील संयम देखील कमी होत चालला आहे आणि त्यांच्यात परिणामांची चिंता न करता कृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी मुलांकडून शाळेचे नियम पाळले गेले पाहिजेत. किशोर वयात पालकांनी मुलांचे मित्र व्हायला हवे. - डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

कुटुंबात एकच संतती असल्यामुळे पालक मुलांना कोणत्याही गोष्टींसाठी नकार देत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये नकार पचविण्याची क्षमता विकसित होत नाही. कुणी काही म्हटले तरी तसेच व्हायला पाहिजे, ही विचारसरणी मुलांच्या मनात दृढ होत चालली आहे. याला आजूबाजूची परिस्थिती पूरक अशीच आहे. - डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीSocialसामाजिक