शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:27 IST

गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे

नम्रता फडणीस

पुणे : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनला असून, मुलांमधील हिंसा शाळेपर्यंत पोहोचली आहे. मुलांना सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्याचे मार्ग कळायला लागले असून, आसपासचे सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण, गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज या गोष्टी मुलांमधील हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी मांजरी येथील एका खासगी शाळेत वार्षिक संमेलनाच्या आयोजनातून वाद झाल्याचा राग मनात धरून नववीच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली. यामुळे मुलांमधील वाढत्या हिंसकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुले घरात असतात तोवर लक्ष ठेवणे शक्य आहे; पण समाजात वावरताना त्यांच्याशी कुणी चुकीचे वागले तर ते कसा प्रतिसाद देतील? त्याचे परिणाम काय होतील, याची आम्हालाही कल्पना नसते, असे पालकांचे म्हणणे आहे.

समाजात बेरोजगार मुले इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अल्पवयीन मुलांसमोर आदर्श घेण्यासारखे कुणी नसेल तर अशा मोठ्या वयाच्या मुलांचा आदर्श घेतला जातो, मुले त्यांचे अनुकरण करायला लागतात. अजूनही एक लक्षात न घेतलेली गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा मुलांना पॅकिंग फूड देण्याकडे कल वाढतोय. एखादी गोष्ट कुरकुरीत ठेवण्यासाठी ज्या कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. त्याचा मुलांच्या मेंदूवरही नकळत परिणाम होतोय. - डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

शाळेत एखाद्या मुलाचे बुलिंग होत असेल तर शांत असलेला मुलगा कधीतरी टोकाचे पाऊल उचलू शकतो. कित्येकदा किशोर वयात मुलांना भावना योग्य पद्धतीने हाताळता येत नाहीत. स्क्रीनच्या व्यसनामुळे मुलांमधील संयम देखील कमी होत चालला आहे आणि त्यांच्यात परिणामांची चिंता न करता कृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी मुलांकडून शाळेचे नियम पाळले गेले पाहिजेत. किशोर वयात पालकांनी मुलांचे मित्र व्हायला हवे. - डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

कुटुंबात एकच संतती असल्यामुळे पालक मुलांना कोणत्याही गोष्टींसाठी नकार देत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये नकार पचविण्याची क्षमता विकसित होत नाही. कुणी काही म्हटले तरी तसेच व्हायला पाहिजे, ही विचारसरणी मुलांच्या मनात दृढ होत चालली आहे. याला आजूबाजूची परिस्थिती पूरक अशीच आहे. - डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीSocialसामाजिक