शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:27 IST

गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे

नम्रता फडणीस

पुणे : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनला असून, मुलांमधील हिंसा शाळेपर्यंत पोहोचली आहे. मुलांना सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्याचे मार्ग कळायला लागले असून, आसपासचे सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण, गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज या गोष्टी मुलांमधील हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी मांजरी येथील एका खासगी शाळेत वार्षिक संमेलनाच्या आयोजनातून वाद झाल्याचा राग मनात धरून नववीच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली. यामुळे मुलांमधील वाढत्या हिंसकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुले घरात असतात तोवर लक्ष ठेवणे शक्य आहे; पण समाजात वावरताना त्यांच्याशी कुणी चुकीचे वागले तर ते कसा प्रतिसाद देतील? त्याचे परिणाम काय होतील, याची आम्हालाही कल्पना नसते, असे पालकांचे म्हणणे आहे.

समाजात बेरोजगार मुले इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अल्पवयीन मुलांसमोर आदर्श घेण्यासारखे कुणी नसेल तर अशा मोठ्या वयाच्या मुलांचा आदर्श घेतला जातो, मुले त्यांचे अनुकरण करायला लागतात. अजूनही एक लक्षात न घेतलेली गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा मुलांना पॅकिंग फूड देण्याकडे कल वाढतोय. एखादी गोष्ट कुरकुरीत ठेवण्यासाठी ज्या कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. त्याचा मुलांच्या मेंदूवरही नकळत परिणाम होतोय. - डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

शाळेत एखाद्या मुलाचे बुलिंग होत असेल तर शांत असलेला मुलगा कधीतरी टोकाचे पाऊल उचलू शकतो. कित्येकदा किशोर वयात मुलांना भावना योग्य पद्धतीने हाताळता येत नाहीत. स्क्रीनच्या व्यसनामुळे मुलांमधील संयम देखील कमी होत चालला आहे आणि त्यांच्यात परिणामांची चिंता न करता कृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी मुलांकडून शाळेचे नियम पाळले गेले पाहिजेत. किशोर वयात पालकांनी मुलांचे मित्र व्हायला हवे. - डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

कुटुंबात एकच संतती असल्यामुळे पालक मुलांना कोणत्याही गोष्टींसाठी नकार देत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये नकार पचविण्याची क्षमता विकसित होत नाही. कुणी काही म्हटले तरी तसेच व्हायला पाहिजे, ही विचारसरणी मुलांच्या मनात दृढ होत चालली आहे. याला आजूबाजूची परिस्थिती पूरक अशीच आहे. - डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीSocialसामाजिक