शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही ‘भीमसेन’ ऐकला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे हे चिरकालीन आहे. संगीतातील कालचक्रावर त्यांच्या अद्वितीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे हे चिरकालीन आहे. संगीतातील कालचक्रावर त्यांच्या अद्वितीय गायकीची मुद्रा उमटलेली आहे. त्याचा गोडवा कधीच कमी होणार नाही. पुढच्या पिढीला आम्ही अभिमानाने सांगू की ‘आम्ही भीमसेन ऐकला’... अशा शब्दांत विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी पंडितजींना भावांजली वाहिली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे संवाद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.३) केला. यावेळी पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, नातू विराज जोशी, गायक पं. उपेंद्र भट, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, किराणा घराण्यातील गायिका मीना फातर्पेकर, गायिका सानिया पाटणकर, समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष राजेश पांडे, संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, संवाद, पुणेच्या निकिता मोघे उपस्थित होते.

डॉ. अभ्यंकर म्हणाले, राष्ट्राने जगाला अध्यात्म आणि अभिजात संगीत या दोन मोठ्या देणग्या दिल्या. आज गायनाच्या क्षेत्रात अनेक घराणी आहेत. मात्र अण्णांनी किराणा घराण्याचा ध्वज ज्या एका उंचीवर नेऊन फडकावला आहे, त्याला तोड नाही. सर्व घराण्यांचा एकत्रित अनुभव अण्णा त्यांच्या सादरीकरणातून परिपूर्ण पद्धतीने द्यायचे. गुरूंकडून शिकणे ही विद्या असते आणि त्याचे सादरीकरण करणे ही कला असते. अण्णा हे देवदत्त होते. अनेक दशके अण्णांनी रसिकांनी ब्रह्मानंद दिला.

‘स्वरभास्कर’ हे अण्णांचे संपूर्ण चरित्र डॉ. शंकर अभ्यंकर यांनी शब्दबद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर तब्बल आठ महिने अण्णांच्या घरी त्याचे वाचन होत होते. एकदा पहाटेच्या वेळी त्यांचा गाण्याचा मस्त मूड लागल्याने त्यांनी मला ‘भटियार’ ऐकवला होता. त्या स्वरांवरची जबरदस्त हुकूमत त्या वेळी अनुभवायला मिळाली असल्याची आठवण डॉ. अभ्यंकर यांनी सांगितली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘कानन दरस करो’ या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांनी पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केले.

समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.