शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: January 22, 2015 23:21 IST

दिवे (ता.पुरंदर) येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यातील आणखी गाळ काढण्याच्या कामाला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

गराडे : दिवे (ता.पुरंदर) येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यातील आणखी गाळ काढण्याच्या कामाला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानंतर ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिले.विकास देशमुख यांनी शंकर काळे व आदी शेतकऱ्यांनी ‘गट शेती संकल्पने’नुसार उभारलेल्या हरित गृहास भेट दिली. या भेटीत हरित गृहातील कॉर्नेशियन लागवडीची पाहणी केली. सदर शेतकऱ्यांनी ‘रोहयो’अंतर्गत लागवड केलेली चिकूची फळबाग व ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत सामूहिक शेततळ्याची माहिती आयुक्तांना दिली.गुलाबराव जगदाळे यांच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या सामूहिक शेततळ्यास आयुक्तांनी भेट दिली. सामूहिक शेततळ्यातील पाणी वापराने भाजीपाला घेऊन आर्थिक फायदा होत असल्याचे जगदाळे यांनी आयुक्तांना सांगितले. श्रीरंग झंडे यांच्या ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना’अंतर्गत २००९-१० मध्ये उभारण्यात आलेल्या २६ गुंठे ‘शेडनेट हाऊस’मधील ढोबळी मिरची; तसेच ८० टन क्षमतेची कांदाचाळ याचीही पाहणी करण्यात आली. (वार्ताहर)पृथ्वीराज ढुमे यांच्या सीताफळ प्रकल्पास भेट दिल्यानंतर, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सिमेंट नालाबांधाची पाहणी केली. सदर बंधाऱ्यामुळे आसपासच्या ५०० मीटर परिसरातील १० ते १२ विहिरी व बोअरवल पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे पाणलोट समितीचे अध्यक्ष राजाराम झेंडे यांनी सांगितले.