शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

समाजाची दिशाभूल रोखण्यासाठी सत्य समोर मांडावे : माधव भांडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST

पुणे : देशात सध्या काहींच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे घटना, संसद आणि सर्वोच्च न्यायालय देखील नाकारले जात आहे. ...

पुणे : देशात सध्या काहींच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे घटना, संसद आणि सर्वोच्च न्यायालय देखील नाकारले जात आहे. त्यामुळेच जे चुकीचे, खोटे आहे तेच रेटून बोलले जात आहे. देशात विघटन आणि विभाजन घडवले जात आहे. समाजाची दिशाभूल रोखण्यासाठी सुजाण नागरिकांनी सत्य समोर मांडले पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी व्यक्त केले.

संविधानाच्या अभ्यासक ॲड. विभावरी बिडवे यांच्या '' निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा-मिथ्य आणि सत्य'' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, माजी खासदार व भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत आणि लेखिका बिडवे उपस्थित होते. कोल्हापूरच्या कृष्णा पब्लिकेशन्सचे लक्ष्मण मलिकवाडकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

गेल्या वर्षी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा मोदी सरकारने आणला आणि मोठा गदारोळ माजवला गेला. घुसखोरांसाठी हा कायदा नसून, तो निर्वासितांसाठी आहे याची जाणीव जेव्हा समाजाला झाली तेव्हा या कायद्याच्या बाजूने समाज एक झाला. शंका दूर झाल्या की गोंधळ कमी होतो त्यासाठी सत्य सांगत राहावे लागते असे सांगून भांडारी म्हणाले,

रावत म्हणाले, आज देशात हिंदुत्त्वाचा विचार मुख्य प्रवाहात आला आहे. हेच अनेकांच्या पोटदुखीचे कारण झाले आहे. हिंदूविरोध उघडपणे विस्थापितांकडून केला जात आहे. आपल्या देशात हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन एकत्र राहातात. त्यांची उपासना पद्धती वेगळी आहे. म्हणून राष्ट्र वेगळे असावे ही मूळ धारणाच चुकीची आहे. मातृभूमीची संकल्पना, शांततापूर्ण सहजीवन हिंदूविरोधी मुस्लिमांना मान्य नाही. त्यामुळे सत्य सांगणारी अशी पुस्तके खऱ्या अर्थाने बौध्दिक हत्यार आहे. त्याचा वापर केला पाहिजे.

प्रतिभा रानडे यांनी निर्वासितांची भीती घालवण्याची आजही गरज आहे. घुसखोरांना हाकलले पाहिजे असे सांगितले.

अक्षय वाटवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

......

आरे ला कारे उत्तर देण्याची गरज

सध्याचे शेतकऱ्यांसाठी आणलेले चांगले कायदे नको म्हणणारे दलालांसाठी काम करीत आहेत. त्यामुळे जेव्हा सत्य सांगण्याची वेळ येते तेव्हा देशाभिमानी नागरिकांनी आरे ला कारे उत्तर दिले पाहिजे असे माधव भांडारी यांनी सांगितले.

....