शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:30 PM

लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

 

पुणे : लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे़ निवृत्ती किसन शिलीमकर (वय ३०, रा. कोथरूड), व्यंकटेश शिवशंकर अनपुर (वय ३१), लहु यादव शेडगे (वय २३,  दोघेही रा़ वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ शंकर हनुमंत धोत्रे (वय ३७,रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये धोत्रे यांचा चुलत मेव्हणा राजू बजरंग कुसाळकर (वय ३८,रा. वारजे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडले आहेत. तर शंकर धोत्रेही जखमी झाले आहेत. हा प्रकार वारजे येथीलगोकुळनगर येथे  मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे.धोत्रे हे कॅब चालविण्याचा व्यावसाय करतात. ते घरी जातअसताना, वाटेत त्यांचे चुलत मेव्हणे राजू एकटेच बसलेले दिसले़ धोत्रे यांनी गाडी चालू ठेवून खाली आले आणि दोघे बोलत थांबले होते. यावेळी पुढे काही अंतरावर उभा असलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी घाबरून जाऊन लाईट बंद केली. तरी देखील आरोपीने लाकडी बांबूने राजू यांच्या डोक्यात जोरात फटके मारले. रक्तबंबाळ अवस्थेत राजू खाली पडले. त्यानंतर दुसºया एकाने देखील लोखंडी सळईने छातीवर व डोक्यात मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना धोत्रे यांनी धावत गाडीतून मेव्हण्याला सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या गाडीचीकाच फोडली व ते पळून गेले़ राजू कुसाळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले़ दारू पिण्यासाठी आरोपी त्या ठिकाणी बसले होते. गाडीची लाईट अंगावर पडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी तिघांनी केलेल्या हल्ल्यात राजू कुसाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्यात ३४ टाके पडले आहेत़ असे असतानाही पोलिसांनी ३०७ खुनाचा प्रयत्न चे कलम न लावता ३२६, ३४१, ३२३, ५०४, ४२७ अशी किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याचे कुसाळकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे़ स्थानिक परिसरात राहणाºया नागरिकांनी सांगितले की, मागील अनेक दिवसापासून या परिसरात सराईतांचा वावर वारला असून, किरकोळ कारणातून नागरिकांना विनाकारण मारहाण केली जात आहे. तसेच दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे़ परिसरातील लोकांवर अचानक हल्ला करणे, दारु राडा करणे, वाहनांची तोडफोड करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईकरावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.