शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:30 IST

लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

 

पुणे : लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे़ निवृत्ती किसन शिलीमकर (वय ३०, रा. कोथरूड), व्यंकटेश शिवशंकर अनपुर (वय ३१), लहु यादव शेडगे (वय २३,  दोघेही रा़ वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ शंकर हनुमंत धोत्रे (वय ३७,रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये धोत्रे यांचा चुलत मेव्हणा राजू बजरंग कुसाळकर (वय ३८,रा. वारजे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडले आहेत. तर शंकर धोत्रेही जखमी झाले आहेत. हा प्रकार वारजे येथील
गोकुळनगर येथे  मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे.

धोत्रे हे कॅब चालविण्याचा व्यावसाय करतात. ते घरी जातअसताना, वाटेत त्यांचे चुलत मेव्हणे राजू एकटेच बसलेले दिसले़ धोत्रे यांनी गाडी चालू ठेवून खाली आले आणि दोघे बोलत थांबले होते. यावेळी पुढे काही अंतरावर उभा असलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी घाबरून जाऊन लाईट बंद केली. तरी देखील आरोपीने लाकडी बांबूने राजू यांच्या डोक्यात जोरात फटके मारले. रक्तबंबाळ अवस्थेत राजू खाली पडले. त्यानंतर दुसºया एकाने देखील लोखंडी सळईने छातीवर व डोक्यात मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना धोत्रे यांनी धावत गाडीतून मेव्हण्याला सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या गाडीचीकाच फोडली व ते पळून गेले़ राजू कुसाळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले़ दारू पिण्यासाठी आरोपी त्या ठिकाणी बसले होते. गाडीची लाईट अंगावर पडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी तिघांनी केलेल्या हल्ल्यात राजू कुसाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्यात ३४ टाके पडले आहेत़ असे असतानाही पोलिसांनी ३०७ खुनाचा प्रयत्न चे कलम न लावता ३२६, ३४१, ३२३, ५०४, ४२७ अशी किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याचे कुसाळकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे़ स्थानिक परिसरात राहणाºया नागरिकांनी सांगितले की, मागील अनेक दिवसापासून या परिसरात सराईतांचा वावर वारला असून, किरकोळ कारणातून नागरिकांना विनाकारण मारहाण केली जात आहे. तसेच दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे़ परिसरातील लोकांवर अचानक हल्ला करणे, दारु राडा करणे, वाहनांची तोडफोड करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई
करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.