शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 15:36 IST

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती

पुणे: पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरूनरेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रातांमधून मुुंबईत जोर येऊन आदळणारे लोंढेच या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले

मुंबईची लोकल चालते कशी हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज उद्धव एकत्र कधी येणार या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या असे पत्रकारांनाही सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार याच्या बातम्यांना जेवढा वेळ दिला तेवढा वेळ आता या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्यांना देणार का असा प्रश्न राज यांनी केला.

रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले कोणालाही माहिती नाही. मेट्रो बांधताहेत, पुल बांधताहेत, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. या सगळ्यांना वाहनतळ नाही, पण त्याविषयीही कोणीही बोलत नाही. पुणे मुंबई ठाणे अशा शहरांमध्ये कुठे आत आग लागली तर तिथे फायरब्रिगेडची गाडीही जाऊ शकत नाही.

शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मुलाखतींमध्ये सांगतो, मात्र त्याला महत्व दिले जात नाही. आमच्या एकत्रिकरणाच्या बातम्या लावल्या जातात. प्रश्न वेगळेच आहेत. मेट्रो, उड्डाणपूल करून नव्या खासगी वाहनांच्या नोंदी होणे थांबले आहे का? नाही थांबलेले. मग हे पूल, मेट्रो, रस्ते वापरते तरी कोण? कधीतरी याचा विचार केला जाणार आहे की नाही असा वैताग राज यांनी व्यक्त केला. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण ते आपल्याकडे होतच नाही असे राज म्हणाले.

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे आहे. सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती. तिकडची रेल्वे इकडे आणू नका, पण ते ती चालवतात कशी? त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत? यामगचा जो विचार आहे तो तरी इकडे घेऊन या, त्याप्रमाणे काम करा. पण तेही काम होत नाही. केंद्र सरकारने, रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे तसेच मनसेचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज यांनी घेत काही सुचना दिल्या असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेrailwayरेल्वेMumbaiमुंबईAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार