शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

By admin | Updated: July 13, 2015 23:45 IST

खेड तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू झाली असून, आळंदी महसुली व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींचीही निवडणूकप्रक्रिया सुरू आहे

आळंदी : खेड तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू झाली असून, आळंदी महसुली व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींचीही निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. प्रथमच आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक जण संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, तिथे पक्षाऐवजी पॅनलप्रमुख कोण, याचे विशेष महत्त्व विचारात घेतले जात असून, बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या परिसरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सोमवार, दि. १३ जुलैपासून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आळंदी महसुली व पोलीस ठाणे हद्दीतील चिंबळी, केळगाव, मरकळ, गोळेगाव, पिंपळगाव, कोयाळी, धानोरी, चऱ्होली खुर्द, कुरुळी व मोई या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आळंदी परिसरातील या गावांमध्ये पक्ष कोणता, याला विशेष महत्त्व दिले जात असून, प्रत्येक इच्छुक गटाकडून योग्य, सक्षम व कार्यक्षम पॅनलप्रमुख पुढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावच्या विकासासाठी झटणाऱ्या व पूर्वी केलेल्या कामाचा प्रभाव मतदारांवर पाडू शकेल, अशी व्यक्ती पॅनलप्रमुख म्हणून समोर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात कुठे दोन, तर कुठे तीन पॅनलपैकी योग्य प्रतिनिधी ठरविण्यासाठी मतदारांनाही जागरूकतेने मतदान करावे लागणार आहे. परिसरातील बहुतांश गावंत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्राबल्य असले, तरी गावाच्या विकासासाठी तरुणांची योग्य व पक्षविरहित फळी तयार करून पॅनल तयार होत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांचे गाव म्हणून परिचित असलेल्या धानोरी ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत आहेत. एकूण १,२५० मतदारसंख्या, ३ प्रभाग व ९ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जागा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. गावात शिवसेना व राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी पॅनलप्रमुख कोण, हेच अद्याप स्पष्ट नसले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणारे व जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिचित असलेले राम गावडे यांना स्वत:च्या गावात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.