शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मग तुम्ही चौदा वर्षे काय केले? : वळसे पाटील

By admin | Updated: February 20, 2017 02:04 IST

झोपेचे सोंंग घेतलेले काही लोक तुम्ही, २७ वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारीत आहेत. त्यांना त्यांच्या विकास

मंचर : झोपेचे सोंंग घेतलेले काही लोक तुम्ही, २७ वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारीत आहेत. त्यांना त्यांच्या विकास आराखड्याबाबत काही विचारले की राग येतो. तुम्ही चौदा वर्षे आमच्याबरोबर होता तेव्हा तुम्हाला काहीच कळले नाही का? असा सवाल करून १३ वर्षांच्या खासदारकीच्या काळात तुम्ही काय काम केले, त्याचे उत्तर जनतेला द्या, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. शिवसेना व भाजपाचा कलगितुरा राज्यात सुरू असून वेळप्रसंगी मध्यावधी निवडणुकांची तयारी करावी लागेल, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा मंचर येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीला याच ठिकाणी सांगता समारोपाची सभा घेऊन आवाहन केले. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ४ व पंचायत समितीच्या ८ जागा निवडून आल्या. या विजयाची पुनरावृत्ती करा, असे आवाहन त्यांनी केले. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत, मात्र काहीजण तुम्ही काय केले आम्ही काय केले, असे म्हणून वाद घालता आहात. महाराष्ट्राच्या विकासाचा हाच का अजेंडा, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, निवडणुकीनंतर सरकार चालेल की नाही, याबाबत साशंकता आहे. शिवसेना-भाजपा एकमेकांची लक्तरे बाहेर काढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची तयारी करावी लागेल असे ते म्हणाले. (वार्ताहर)