शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘संग्रामदुर्ग’मध्ये उभारणार शिवसृष्टी

By admin | Updated: February 16, 2015 04:33 IST

अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़

हणमंत देवकर, चाकणअरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़ यामुळे चाकण (जि. पुणे) ग्रामस्थांनी गावातील ‘संग्रामदुर्ग’ या भुईकोट किल्ल्याच्या पूर्नविकासाचा विडा उचलला आहे. चाकणला सुपे परगणा म्हणून संबोधले जायचे. येथे मध्यवर्ती ठिकाणी संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे़ त्यास चारही बाजूने खंदक आहे़ किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मोठा पराक्रम करुन हा किल्ला ५६ दिवस लढविला होता़ त्यामुळे या किल्ल्याला संग्रामदुर्ग असे संबोधण्यात येऊ लागले़ या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती़ सर्वत्र झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते़ तटबंदीला भगदाडे पडली होती़ बुरुज ढासळले होते़ ठिकठिकाणी राडारोडा टाकण्यात येत होता़ इतकेच काय बेवारस मृतदेह गाडण्यात येत होती़ आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती़ शिवप्रेमींनी दर शनिवार, रविवार श्रमदान करण्याचे ठरविले़ या श्रमदानातून किल्ल्याची अंतर्बाह्य साफसफाई झाली. त्यातूनच २००३ मध्ये किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली़