शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खड्डय़ांमुळे शिवणो ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: September 29, 2014 23:52 IST

दुरुस्ती करूनही रस्त्यांची सातत्याने होणारी दुरवस्था अशा बिकट परिस्थितीतून सध्या पुण्यालगत असलेल्या शिवणो गावातील नागरिकांना वाट काढावी लागत आहे.

पुणो : अरुंद खड्डेमय रस्ते, जागोजागी कच:याचे ढीग, पावसाळ्यात रस्त्यात तयार होणारी डबकी, तात्पुरती खडी टाकून दुरुस्ती करूनही रस्त्यांची सातत्याने होणारी दुरवस्था अशा बिकट परिस्थितीतून सध्या पुण्यालगत असलेल्या शिवणो गावातील नागरिकांना वाट काढावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शिवणो परिसरात प्रवेश केल्यापासून देशमुख वाडी, उत्तमनगर, कोंढवे धावडेर्पयतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कागदोपत्री महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही शिवणो येथील नागरिकांना मूलभूत समस्यांचा अभावच पाहायला मिळत आहे. शासकीय विभागाच्या टोलवाटोलवीमध्ये वाहनचालक मात्र भरडले जात आहेत.  या परिसरात औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढत आहे. तसेच नवनवीन इमारती, वसाहती उभ्या राहत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरूअसते. परंतु, सध्या या मुख्य रस्त्यावर गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 
शिवणो, उत्तमनगर, कोंढवे धावडेतील मुख्य रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी केली जात आहे. या सर्व टोलवाटोलवीत स्थानिक रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत. सध्याच्या वाहतुकीच्या मानाने हा रस्ता अतिशय अपुरा ठरत आहे. 
या मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्टय़ा दीड ते दोन फुटांनी खचल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत असून वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. 
तसेच वाहनचालकांना पाठीच्या, मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत.  (प्रतिनिधी)
 
4या परिसरातील केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांची परिस्थितीही अतिशय बिकट आहे. अनधिकृत बांधकामे, दोन वसाहतींमधील पुरेशा जागेचा अभाव यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडीस सामोरे जावे लागते. एका वेळी एकच चारचाकी जाऊ शकेल एवढय़ाच रुंदीचे रस्ते डोकेदुखी ठरत आहेत. स्थानिक ग्रामस्थांची अरेरावी, स्थानिक प्रशासनाची उदासिनता यामुळे रस्त्यांची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
 
शिवणो, उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरातील मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारीही याच विभागामार्फत करण्यात येते. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. ही कामे आमदार फंडातून केली जातात. रस्त्याच्या दुरुस्तीबाबतच्या सूचना ग्रामपंचायती मार्फत दिल्या जातात. मात्र, कार्यवाही त्या विभागामार्फतच केली जाते.
-  पूजा गायकवाड, सरपंच, कोंढवे धावडे