शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित ६० टक्के जमिनीचे संपादन करून पुरंदर विमानतळ प्रकल्प मार्गी लावणार; अजित पवार यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:15 IST

शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जमिनी आणि घरे संपादित होत आहेत

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज देऊ केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमिनी विकल्या आहेत, अशा जमिनी देण्यास संबंधित मालक तयार आहेत. या जमिनी ताब्यात घेण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून पुरंदरविमानतळबाधितांचा विरोध न जुमानता हा प्रकल्प होणारच, असे स्पष्ट संकेतच पवार यांनी दिले आहेत.

पुरंदर येथील विमानतळासाठी सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून जमिनीच्या मोजणीपूर्वी करण्यात येणारे ड्रोन सर्वेक्षण शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या विरोधामुळे थांबविण्यात आले. या आंदोलनावेळी दगडफेक तसेच लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत शेतकऱ्यांची चर्चा केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात पुढाकार घेत शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या महत्त्वविषयी कल्पना दिली. पुरंदर विमानतळ होणारच, असेही बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी देताना मोबदला कशा प्रकारे अपेक्षित आहे, याचा प्रस्ताव द्यावा. अन्यथा राज्य सरकार एक सर्वमान्य प्रस्ताव तयार करून तो शेतकऱ्यांपुढे मांडेल, असे सुचविले. याच वेळी बावनकुळे यांनी सर्वेक्षण थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

या घटनेला आता जवळपास महिना उलटला आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळासंदर्भात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. १७) जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जमिनी आणि घरे संपादित होत आहेत, अशांचा विरोध आहे. मात्र या सात गावांमधील सुमारे ६० टक्के जमीन अन्य लोकांनी खरेदी केली आहे. मधल्या काळात हे जमीनमालक जमीन देण्यास तयार झाले आहेत. ते जर जमीन द्यायला तयार असतील तर ही ६० टक्के जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

यावरून बाधित शेतकऱ्यांचा विरोध डावलून जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, अशांच्या जमिनी संपादित करून प्रकल्प मार्गी लावण्याचे संकेत पवार यांनी यावेळी दिले. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांचा विरोध किती राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारPurandarपुरंदरAirportविमानतळ