शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

उर्वरित ६० टक्के जमिनीचे संपादन करून पुरंदर विमानतळ प्रकल्प मार्गी लावणार; अजित पवार यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:15 IST

शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जमिनी आणि घरे संपादित होत आहेत

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज देऊ केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमिनी विकल्या आहेत, अशा जमिनी देण्यास संबंधित मालक तयार आहेत. या जमिनी ताब्यात घेण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून पुरंदरविमानतळबाधितांचा विरोध न जुमानता हा प्रकल्प होणारच, असे स्पष्ट संकेतच पवार यांनी दिले आहेत.

पुरंदर येथील विमानतळासाठी सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून जमिनीच्या मोजणीपूर्वी करण्यात येणारे ड्रोन सर्वेक्षण शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या विरोधामुळे थांबविण्यात आले. या आंदोलनावेळी दगडफेक तसेच लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत शेतकऱ्यांची चर्चा केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात पुढाकार घेत शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या महत्त्वविषयी कल्पना दिली. पुरंदर विमानतळ होणारच, असेही बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी देताना मोबदला कशा प्रकारे अपेक्षित आहे, याचा प्रस्ताव द्यावा. अन्यथा राज्य सरकार एक सर्वमान्य प्रस्ताव तयार करून तो शेतकऱ्यांपुढे मांडेल, असे सुचविले. याच वेळी बावनकुळे यांनी सर्वेक्षण थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

या घटनेला आता जवळपास महिना उलटला आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळासंदर्भात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. १७) जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जमिनी आणि घरे संपादित होत आहेत, अशांचा विरोध आहे. मात्र या सात गावांमधील सुमारे ६० टक्के जमीन अन्य लोकांनी खरेदी केली आहे. मधल्या काळात हे जमीनमालक जमीन देण्यास तयार झाले आहेत. ते जर जमीन द्यायला तयार असतील तर ही ६० टक्के जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

यावरून बाधित शेतकऱ्यांचा विरोध डावलून जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, अशांच्या जमिनी संपादित करून प्रकल्प मार्गी लावण्याचे संकेत पवार यांनी यावेळी दिले. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांचा विरोध किती राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारPurandarपुरंदरAirportविमानतळ