शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाने सावरला संसार

By admin | Updated: September 23, 2016 02:16 IST

संस्था बुडाली, पगार थकला, त्यात डोळ्यांच्या आजाराने खिशातील दमडीही शिल्लक राहिली नाही. मात्र, पत्नी व दोन मुलांच्या मदतीने अवघ्या एका एकरात डाळिंबाच्या बागेपासून ८ लाख ६५ हजारांचे

शैलेश काटे, इंदापूरसंस्था बुडाली, पगार थकला, त्यात डोळ्यांच्या आजाराने खिशातील दमडीही शिल्लक राहिली नाही. मात्र, पत्नी व दोन मुलांच्या मदतीने अवघ्या एका एकरात डाळिंबाच्या बागेपासून ८ लाख ६५ हजारांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्याने आपला संसार सावरला.इंदापूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर माळवाडी नं. १ च्या रस्त्याला लागून असणारी म्हेत्रेवस्ती ही अंकुश म्हेत्रे यांची जन्मभूमी. पत्नी शकुंतला, मुले सिद्धार्थ व विश्वम असे आटोपशीर कुटुंब. गेली तिसेक वर्षे इंदापुरातील तालुका दूध संघात नोकरीला असणारे म्हेत्रे यांची परवड दूध संघाचा कारभार डळमळीत झाल्याने सुरू झाली. त्यात डोळ्यांचा आजाराने खर्च वाढवला. मुलांचे शिक्षण सुरू असतानाच हा प्रसंग ओढवल्यामुळे म्हेत्रे काळजीत पडले. आपल्याकडे असलेली एक एकर ५ गुंठे जमीन कसण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्नी व मुलांना विश्वासात घेतले. त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य होतेच. मिळून कष्ट करण्याची तयारी त्यांनी दाखविली. ही त्यांच्या भावी यशाची पहिली नांदी होती. याच वेळी त्यांना रानडे कृषी औषधचे होडशीळ व बळीराजा कृषी सेवा केंद्राचे प्रकाश मारकड यांचे मार्गदर्शन मिळाले.आपल्या रानात म्हेत्रे यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची ५५० झाडे लावली. चालूच्या दुसऱ्या पिकाची छाटणी त्यांनी केली. सहा ट्रॉली शेणखत, सुरुवातीचा रासायनिक भेसळ डोस दिला. एक मार्चला पाणी दिले. दोन महिन्यांनी सेटिंग झाल्यानंतर दुसरा डोस दिला. ब्लोअर ट्रॅक्टरने औषधफवारणी केली.तोडणीयोग्य माल झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला तोडा झाला. सहा टन माल निघाला. दुसऱ्या तोड्यात चार टन व तिसऱ्या तोड्यात दोन टन माल निघाला. या १२ टन मालाव्यतिरिक्त एक ते दीड टन माल झाडावर आहे. सरासरी प्रतिकिलोस ८० रुपये दर मिळाला. शेणखत, औषधे व इतर आनुषंगिक बाबींसाठी झालेला ९५ हजार रुपये खर्च वजा जाता, ८ लाख ६५ हजार रुपयांचा नफा म्हेत्रे कुटुंबाने मिळविला आहे.