शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही तर प्रभाग समितीची बैठकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ...

पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. पाण्याच्या समस्येवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत शुक्रवारी आयोजित केलेली बैठक बंद पाडली.

एकीकडे धरणात गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणीसाठा असून पाणीकपात केली जाणार नसल्याचे प्रशासन म्हणते आहे. तर, दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केलेली होती. या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्षांसह सर्व बारा नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू होताच नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक १७,१८ आणि १९ मधील पाणी समस्येवर उपाय करण्याची मागणी केली.

शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या खडलवासला धरणासाखळीत मुबलक पाणी असतानाही शहरातील नागरिकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल केला. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढल्याचे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाकडून कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय ही चर्चा सुरू राहिल्याने नगरसेवक संतापले. त्यांनी ही बैठक रद्द करीत जोपर्यंत या भागाला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. बैठकीला उपस्थित असलेल्या उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना फोन लावून याविषयी उपाययोजना करण्याबाबत नगरसेवक आक्रमक असल्याचे सांगितले. पावसकर यांनी येत्या दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्ग लावत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले. जर दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर, सर्वपक्षीय १२ नगरसेवक पालिका आयुक्तांना घेराव घालणार असल्याचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.