शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:25 IST

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही

नितीन चौधरी

पुणे : राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून प्रत्येक महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केला जातो. मात्र, एप्रिलचा अहवाल अद्यापही सादर झालेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा अहवाल त्यानंतरच सादर होईल हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल सादर झाल्यानंतरच महसूल विभागाकडून नुकसानभरपाईसंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येईल. त्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल, असे चित्र आहे.

एप्रिलमध्ये २८ हजार हेक्टर बाधित

राज्यात मार्चचा अखेरचा आठवडा आणि एप्रिलचे पहिले दोन आठवडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील २८ हजार ३५२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्यापही सुरू असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ पाच ते सहा जिल्ह्यांमधूनच नुकसानीचा ‘अबकड’ अंतिम अहवाल कृषी आयुक्तालय कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या अखेर व मे च्या सुरुवातीपासून अवकाळीने पुन्हा नुकसान झाल्याने पंचनाम्याचे काम सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘मे’मध्ये ६४ हजार हेक्टरचे नुकसान

त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सबंध मे महिन्यात पूर्व मोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांना फटका दिला. त्यात राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातही अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

अद्याप अहवालच नाही

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात मदत व पुनर्वसन विभाग अद्याप निर्णय घेऊ शकलेला नाही.

ऑक्टोबर २०२४ पर्यंतची मदत जमा

यापूर्वी राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६४० कोटी ४७ लाखांचा निधी वितरित केला होता. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या काळासाठी ५९० कोटी १५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfarmingशेतीSocialसामाजिकMONEYपैसा