शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळशी’चे पाणी राखीव ठेवा

By admin | Updated: September 5, 2015 03:27 IST

टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तशी मागणी केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही टाटाचे पाणी राखीव ठेवा, असा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.पुणे विभागात सर्वाधिक पाणीसाठा सध्या टाटा कंपनीची खासगी मालकी असलेल्या मुळशी धरणात शिल्लक आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती करून मुंबईला पुरविली जाते. २देशपातळीवर सध्या वीज अतिरिक्त असल्याने ‘नॅशनल ग्रीड’मधून आणणे शक्य आहे. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि मराठवाड्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पाणी राखीव ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेच टाटा कंपनीकडे असलेल्या मुळशी, वळवण या धरणांचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, असा विषय ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला होता.आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर सकारात्म चर्चा झाली. सभेच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात काय स्थिती आहे, याची मांडणी करण्यात आली. त्यानंतर त्या त्या तालुक्यातील सदस्यांनी तेथील चित्र मांडले. यात टाटाच्या मुळशी धरणातील १५ टीएमसी पाणी राखीव ठेवले, तर जिल्ह्याची भविष्यातील पाणीटंचाई दूर होईल, असा विषय सदस्यांनी मांडला. याला सर्वांनी अनुमती देऊन तसा ठराव करून, तो पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जाहीर केले. त्यानंतर कार्यकारी अभियंता वि. भा. जाधव यांनी मुळशी धरणातून १.२ टीएमसी पाणी आपण वापरू शकतो. ही चर्चा मी वरिष्ठांच्या कानावर घालतो, असे सांगितले. या सभेत उजनी धरणातही -0.९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणीही राखीव ठेवा, अशी मागणी सदस्यांनी केली. सर्व चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी लवकरच जिल्हा परिषद दुष्काळी दौरे करणार असून, यात निदर्शनास आलेल्या परिस्थितीनुसार उपाययोजना करेल, असे जाहीर केले. (प्रतिनिधी)