शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुणे- मुंबई महामार्गावर टोलमध्ये कोट्यवधीचा गफला : आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 7:00 AM

वारंवार मुदतवाढ देऊन या मार्गावरील टोलमधून गेल्या दोन वर्षात तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांची वसुली बेकायदा केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

ठळक मुद्दे२ हजार ५०० कोटी रुपये जादा उकळले

पुणे: प्रशासकीय व देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता मुळ भांडवल, त्यावरचे व्याज असा दामदुप्पट परतावा मिळाल्यानंतरही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरची टोल वसुली सरकारने सुरूच ठेवली आहे. वारंवार मुदतवाढ देऊन या मार्गावरील टोलमधून गेल्या दोन वर्षात तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांची वसुली बेकायदा केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पाटीर्ने(आप) केला आहे. टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आप ने केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १५ वर्षांपूर्वी टोल ची पद्धल सुरू केली.

खासगी व्यावसायिकांनी रस्ते बांधणीसाठी त्यांची गुंतवणूक करायची, देखभाल दुरूस्तीही करायची व त्या बदल्यात त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा व्याजासह परवतावा होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर दर ४० किलोमीटर अंतरावर टोल लावायचा असा करार त्यावेळी केला. व्यावसायिकाला त्याच्या रकमेचा परतावा देताना त्याने गुंतवलेली रक्कम, त्यावरचे व्याज, त्याला मिळणारा फायदा तसेच त्या मार्गावरची २४ तासांतील वाहन संख्या वगैरेचा बारकाईने विचार करून टोलची किंमत निश्चित केली होती.पुणे-मुंबई द्रुतगती मागार्साठी ९१८ कोटी रूपयांची  बोली लावणाऱ्या एका कंत्राटदाराची निविदा मान्य झाली. त्यांना ते करणार असलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात द्रुतगती मार्ग व  जुन्या महामार्गावर टोल वसुलीचे हक्क दिले. करारात नमुद केल्याप्रमाणे वसुलीचे एकूण उद्दीष्ट ४३३० कोटी (२८६९ कोटी एक्स्प्रेस वे वर अधिक १४६१ कोटी जुन्या रस्त्यावर) निश्चित करण्यात आले. हे उद्दीष्ट पुर्ण झाल्यानंतरही कंत्राटदाराने जानेवारी २०१७ अखेर ४५०७ कोटी टोल वसूल केला होता. मूळ भांडवलावरचा परतावा, कार्यालयीन खर्च, दुरुस्ती, देखभाल, सुविधा खर्च या सर्व बाबीशिवाय पुढील दोन वर्षांची देखभाल, हा सर्व खर्च या टोल वसुलीच्या उद्दिष्ट असलेल्या ४३३० कोटीत गृहीत धरलेला आहे. जास्तीची वसुली झालेली असतानाही हा टोल सरकारने कंत्राटदाराच्या मागणीवरून एप्रिल २०१७ पासून वाढवला. कागदपत्रानुसार फेब्रुवारी २०१९ अखेरची जमा ६३६९ कोटी, म्हणजे उद्दिष्टापेक्षा अंदाजे २००० कोटीने अधिक आहे. आता ऑगस्ट २०१९ मध्ये हा वाढीव करार संपत असूनही सरकार पुढे टोल वसुली सुरूच ठेवणार असल्याचे दिसते आहे. कंत्राटदार व अधिकारी यांचे यात संगनमत असल्याचे स्पष्ट दिसत असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. यात प्रवासी नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असूनही त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस