शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१०९ वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र बँकेची ४१ हजार ६६६ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या १०९ वर्षांच्या इतिहासात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या १०९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटी रुपये इतकी उच्चांकी उलाढाल यंदाच्या आर्थिक वर्षात केली आहे.

बँकेची १०९ व वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन झाली. यावेळी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा आढावा बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी घेतला. त्यावेळी ही माहिती त्यांनी दिली. “बँकेस गेल्यावर्षीप्रमाणेच ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला. बँकेला सव्वातीनशे कोटींचा निव्वळ नफा झाला,” असेही अनास्कर यांनी सांगितले. प्रशासक अनास्कर यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख तसेच बँकेचे अनेक सभासद सभेला ऑनलाईन उपस्थित होते.

अहवाल वर्षात इतिहासात राज्य बँकेने प्रथमच एकूण ४१ हजार कोटींपेक्षा जास्त उच्चांकी उलाढाल केली. तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक असताना, राज्य बँकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले. अहवाल वर्ष अखेर बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २ हजार २८२ कोटी रुपये असून बँकेचा स्वनिधी ४ हजार ७८४ कोटींपर्यंत पोहचले. अहवाल वर्षात बँकेला १ हजार ३४५ कोटींचा ढोबळ नफा झाला. तरतूदींनंतर सव्वातीनशे कोटींचा नक्त नफा झाला, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली.

बँकेने प्रथमच अनुत्पादक कर्जासाठी १०० टक्के तरतुद केल्याने निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ० टक्के झाले आहे. नाबार्डने सक्षम बँकेचे जे २९ निकष दिले त्यापैकी राज्य बँक १९ निकष पूर्ण करत असून दहा निकषही सरासरी निकषापेक्षा काही अंशानी कमी आहेत. बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपुरते मर्यादित ठेवले नाहीत. राज्यातील सर्व जिल्हा बँका, नागरी बँका, पतसंस्था, हाऊसिंग सोसायट्या व इतर सर्व सहकारी संस्थांच्या बाबतीत राबविलेल्या अनेक योजनांचा फायदा बँकेला झाल्याचे अनास्कर म्हणाले.