शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST

पुणे : ‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा ...

पुणे : ‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा काहीशी वेगळीच असते. मात्र कोरोनाने जोडप्यांच्या आनंदात पूर्णत: विरजण पाडले. तरीही, कोरोना काळातही जोडप्यांनी लग्नाचा बार उडवलाचं! काहींचे मुहूर्त चुकले असले तरी नोंदणी पद्धतीने विवाह करून जोडप्यांनी नवीन संसाराला सुरूवात केली. वर्षभरात (मार्च 2020 ते मार्च 2021) 5228 विवाह नोंदणी पद्धतीने झाले.

बहुतांश जोडप्यांनी गतवर्षी लग्न करण्याचे नियोजन केले होते. रितसर मुहूर्त काढून मंगल कार्यालये, लॉंन्स बुक झाली होती. मात्र कोरोनाने पुण्यात प्रवेश करून विवाहामध्ये विघ्न आणले. मार्चपासून डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागला आणि जोडप्यांची स्वप्न भंग पावली. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मंगल कार्यालये, लॉन्स मध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीत विवाह कार्य पार पाडण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याचा काही जोडप्यांनी फायदा घेत रितसर धार्मिक व वैदिक पद्धतीने विवाह केला. मात्र, बहुतांश जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्याच्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देखील पुन्हा एकदा विवाहकार्याच्या संख्येवर अजून मर्यादा आणली आहे. त्यामुळे आता विवाहावर पैसा खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर अनेक जोडप्यांनी भर दिला असून, कुटुंबीयांकडूनही त्यांच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जोडप्यांकडून नवीन वर्षात नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्यास पसंती दिली जात आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात जवळपास निम्मे म्हणजे 2031 विवाह नोंदणी पद्धतीने झाले. तर मार्च 2020 ते मार्च 2021 दरम्यान 5228 जोडपी विवाहबंधनात अडकली.

----------------------

जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये 83 विवाह मुहूर्त होते. यंदाच्या वर्षी एप्रिल मध्ये 11 मुहूर्त व मे महिन्यात 14 मुहूर्त असल्याची माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

-----------------------------------

गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालये, लॉन्स बंद होते. त्यामुळे एप्रिल-मे चे मुहूर्त हुकले. कुटुंबांनी मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द केले. त्यामुळे वर्षभरात केवळ 20 विवाहच जेमतेम पार पाडले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची वाढती संख्या पाहाता विवाहकार्य वगळता इतर कोणत्याच सण, समारंभांना परवानगी नाही. विवाह कार्य देखील 25 लोकांच्या उपस्थितीतच पार पाडण्यास मंजुरी दिली आहे. आत्ता खरेतर 20 एप्रिलपासून सिझन सुरू होणार होता. मात्र 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने या मुहूर्तांवर पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा 3 मे पासून मुहूर्त आहेत, बघू या काय निर्णय होतोय.

- प्रसाद दातार, प्रतिज्ञा मंगल कार्यालय

------------------------

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यातच नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जात आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह हे विशेष विवाह कायद्यानुसार पार पाडले जातात. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे.

-डी. ए. सातभाई, विवाह नोंदणी अधिकारी .

---------------------------