शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर मृत्यूप्रकरणी ठेकेदारास अटक

By admin | Updated: September 27, 2015 01:15 IST

जी. के. फॉर्च्युन या बांधकाम संस्थेच्या पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बुधवारी मजूर महिलेचा डोक्यात लाकडी वासा पडून मृत्यू झाला.

पिंपरी : जी. के. फॉर्च्युन या बांधकाम संस्थेच्या पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बुधवारी मजूर महिलेचा डोक्यात लाकडी वासा पडून मृत्यू झाला. सतरूपा यादव या मजूर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. गोपाल चन्नया सूर्यवंशी (वय ४३, रा. जगताप डेअरी, रहाटणी, मूळ गाव तेलंगणा) या ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लाकडी वासा डोक्यात पडून बुधवारी मजूर महिलेचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहचण्यास तब्बल आठ तासांचा अवधी गेला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये, प्रकरणाची वाच्यता होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊ नये, याकरता दबाव तंत्राचा अवलंब करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक, संबंधित ठेकेदाराने कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा साधने पुरवली नसल्याचे उघड होईल, निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, ही बाब निदर्शनास आली, तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. महिलेच्या वारसांना, कुटुंबीयांना भरपाई द्यावी लागेल. हे सर्व टाळण्यासाठी कोणालाही काही समजण्याच्या आत परस्पर प्रकरण मिटविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. परंतु, लोकमतने या प्रकरणी पाठपुरावा केल्यामुळे प्रकरणाची दखल घेतली गेली. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला. ठेकेदाराला अटकसुद्धा झाली आहे. त्यामुळे बांधकाम कामगार सेनेने लोकमतचे आभार मानले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या महिलेची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिला दोन लहान मुले आहेत. पती मोलमजुरीचे काम करतात. घडलेल्या घटनेबद्दल आवाज उठविणारे, न्याय मागणारे कुटुंबात कोणीच नाही. या परिस्थितीचा गैरफायदा उठविण्याचा ठेकेदाराकडून प्रयत्न झाला. -----दक्षतेचा अभावपिंपळे सौदागर येथील गृहप्रकल्पाच्या ठिकाणी दुर्घटना घडली. त्या ठिकाणी कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. इमारतीचे काम सातव्या मजल्यापर्यंत सुरू आहे. उंचावर काम सुरू असताना कोठेही सुरक्षा जाळी लावलेली नव्हती. मजूरांना हेल्मेट उपलब्ध करून दिलेली नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीच काळजी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली असून, निदान यापुढे तरी या घटनेतून बोध घेऊन बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. अशा घटना घडल्यानंतरही दक्षता घेतली जात नसेल, तर बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.बिल्डरवरही गुन्हा दाखल कराबांधकाम मजुरांना सुरक्षा साधने पुरविण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची आहे. मजुरांना सुरक्षा साधने न पुरविता निष्काळजीपणा दाखविल्याने महिलेचा जीव गेला. सुरुवातीला पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ नये, याचा प्रयत्न झाला. नंतर गुन्हा दाखल झाला, तो ठेकेदारावर. परंतु, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दाखल होणे आवश्यक आहे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जयंत शिंदे आणि उपजिल्हाप्रमुख किशोर हातागळे यांनी केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)