शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो’ द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होणार; डॉ. गणेश देवी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:47 IST

आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार

पुणे : सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक उद्देशाने काढण्यात येत असलेल्या ‘भारत जोडो’द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असा विश्वास गांधीवादी ज्येष्ठ विचारवंत व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार आहे, असेही ते म्हणाले.

डाॅ. देवी म्हणाले की, एकशे दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहमदाबादपासून गदगपर्यंत झंझावाती प्रवास केला. त्यात त्यांना काही नवीन अनुयायी मिळाले. त्यावेळी गांधीजींचे वय होते ५२ वर्षे. याच वयात राहुल गांधी देशातील द्वेषाचे वातावरण संपविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत 'भारत जोडो' पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे

इंग्रज देशावर राज्य करीत होते, तेव्हा त्यांच्याविरूद्ध लढणाऱ्या एका सामाजिक संघटनेचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या संघटनेचे नाव ‘काँग्रेस’. समाजात निर्माण झालेले तणाव, आरएसएसचे दुफळी माजवणारे धोरण, भाजपच्या समाज तोडण्याच्या विघातक प्रवृत्तीमुळे समाजाचे विघटन होत आहे. ते कमी करून समाजाला एकत्र आणण्यासाठी भारत जाेडाे यात्रा काढली जात आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे, असेही डाॅ. देवी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा