शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

‘भारत जोडो’ द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होणार; डॉ. गणेश देवी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:46 PM

आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार

पुणे : सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक उद्देशाने काढण्यात येत असलेल्या ‘भारत जोडो’द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असा विश्वास गांधीवादी ज्येष्ठ विचारवंत व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार आहे, असेही ते म्हणाले.

डाॅ. देवी म्हणाले की, एकशे दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहमदाबादपासून गदगपर्यंत झंझावाती प्रवास केला. त्यात त्यांना काही नवीन अनुयायी मिळाले. त्यावेळी गांधीजींचे वय होते ५२ वर्षे. याच वयात राहुल गांधी देशातील द्वेषाचे वातावरण संपविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत.सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत 'भारत जोडो' पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे

इंग्रज देशावर राज्य करीत होते, तेव्हा त्यांच्याविरूद्ध लढणाऱ्या एका सामाजिक संघटनेचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या संघटनेचे नाव ‘काँग्रेस’. समाजात निर्माण झालेले तणाव, आरएसएसचे दुफळी माजवणारे धोरण, भाजपच्या समाज तोडण्याच्या विघातक प्रवृत्तीमुळे समाजाचे विघटन होत आहे. ते कमी करून समाजाला एकत्र आणण्यासाठी भारत जाेडाे यात्रा काढली जात आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे, असेही डाॅ. देवी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा