शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य नेमताना गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे भवितव्य हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या हाती आहे. आयोगाने ओबीसींचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे भवितव्य हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या हाती आहे. आयोगाने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार केला अन् तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला तरच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, या आयोगावरील सदस्यांची नेमणूक बेकायदा पद्धतीने झाल्याने त्यांच्या कामाचा दर्जा प्रश्नांकित आहे. इम्पेरिकल डेटा तयार होण्याअगोदर संबंधित सदस्यांची सत्यापित माहिती जाहीर करा. अन्यथा, येत्या २ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदाेलनाचा इशारा धनगर विवेक जागृती अभियानच्या वतीने देण्यात आला आहे.

आयोगावरील सदस्यांच्या नेमणुकीत गडबड घोटाळा दूर करावा. अन्यथा, २ ऑक्टोबरपासून पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ढोणे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय झाल्यावरच निवडणुका घ्याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी आहे. या प्रकरणात राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करणे गरजेचे आहे. तो डेटा मान्य झाला तरच आरक्षण मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. मात्र, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष फक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे.

राज्य मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार सदस्य हे निकषास पात्र, तसेच चांगले. राज्य शासनाने १५ जून २०२१ रोजी काढलेल्या अधिसूचनेत दोन सदस्यांचे प्रवर्ग चुकीचे प्रसिद्ध केले. डॉ. गजानन काशिराम खराटे यांचा प्रवर्ग खुला, तर प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे यांचा प्रवर्ग भज-ड दर्शविला. वास्तविक खराटे यांचा प्रवर्ग भज-क असल्याचे तर गोविंद काळे यांचा प्रवर्ग खुला असल्याचे नंतर शासनाच्या लक्षात आले. त्यानंतर शासनाने शु्द्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

-----

प्राचार्य बबनराव तायवाडे हे समाजशास्त्रज्ञ कसे?

आयोगावरील समाजशास्त्रज्ञाच्या जागी प्राचार्य बबनराव तायवाडे यांची नियुक्ती केली आहे. तायवाडे हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांचे कॉमर्स शाखेतील शिक्षण आहे. समाजशास्त्राशी संबंध नसल्याचे त्यांच्या परिचयपत्रावरून दिसते आहे. महत्वाची बाब म्हणजे आयोगाचे सदस्य म्हणून ते तटस्थ नाहीत, असे विक्रम ढोणे यांनी सांगितले.