शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आयत्या वेळच्या विषयांवर गोंधळ

By admin | Updated: September 5, 2015 03:25 IST

आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १३ विषय हे आयत्या वेळेस आल्याने, सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

पुणे : आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १३ विषय हे आयत्या वेळेस आल्याने, सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.अर्थसंकल्पानंतर सहा महिने का वाया घालविले? आधी हे विषय का आले नाहीत? पंचायत राज कमिटीमुळे कामकाज बंद ठेवले होते का? असे प्रश्न उपस्थित करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी विलंब झाला हे मान्य केले. पंचायत राज कमिटी १० वर्षांनंतर आली होती. तसेच, त्यांनी अचानक दौऱ्याचे नियोजन बदलले. याम अडीच ते तीन महिने गेले, असे स्पष्ट केले. मात्र, यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. यानंतर आर्थिक विषय ऐनवेळी घेता येतात का, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे व आशाताई बुचके यांनी उपस्थित करीत काही काळ कायद्याचा किस पाडला. त्यानंतर प्रशासनाने आर्थिक विषय ऐनवेळच्या ठरावात येत नाहीत. अपवादात्मक परिस्थितीतच ते येतात, असे स्पष्ट करीत हे ठराव सभेत घेण्यास अपात्र असल्याचे जाहीर केले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मध्यस्थी करीत खातेप्रमुखांना सक्त सूचना दिल्या, की यापुढे असे होता कामा नये. यापुढे परत ही चूक होणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर माऊली खंडागळे यांनी माझा विरोध नोंदवून मंजुरी द्या, असे सांगितले. त्यावर पेच निर्माण झाल्याने अध्यक्षांनी आतापर्यंत प्रशासनाच्या या चुका सहन करीत आलो आहोत. यानंतर असेच झाले तर मी स्वत: तुमच्या बरोबर असेल, असे आश्वासन दिल्यानंतर विषय मंजूर करण्यात आले. सदस्यांना पत्राला उत्तरे दिली जात नाही, ठेकेदारांच्या शिरकावावरही चर्चा झाली.