शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला कचराकोंडी

By admin | Updated: January 22, 2015 23:19 IST

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चाकणकर त्रस्त झाले आहेत.

चाकण : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चाकणकर त्रस्त झाले आहेत. कचऱ्याचे सुनियोजित व्यवस्थापन करून कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी होत आहे. तसेच, खराबवाडी दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित न उचलल्यास आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर, बिरदवडीच्या ग्रामस्थांनी व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या खराबवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दिला आहे. खराबवाडी येथील डब्ल्यूएमडीसी जवळील दगड खाणीमध्ये चाकण परिसर व तालुक्यातील काही ग्रामपंचायती अनधिकृतपणे कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करीत आहेत. तसेच, परिसरातील कारखाने रात्रीच्या वेळी रासायनिक व औद्योगिक टाकाऊ कचरा टाकीत आहे. त्यामुळे खाणीलगत असणारी औद्योगिक वसाहत, वाघजाईनगर, बिरदवडी येथील मुळेवस्ती, पवार वस्तीच्या रहिवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, परिसरात माश्यांचा उपद्रव सुरूझाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून दगड खाणीतील कचरा डेपो बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात सत्संग विहारजवळ, पोलीस स्टेशनसमोर, चक्रेश्वर रोड, नेहरू चौकातील भाजी बाजार, खंडोबा माळ, आगरवाडी रस्ता, मनशक्ती केंद्राजवळ, मीरा मंगल कार्यालयासमोर, आगरकर वस्तीजवळ, मुटकेवाडीच्या पुलाजवळ तसेच आंबेठाण रोडवर झित्राई मळ्यात, राजलक्ष्मी रेसिडेन्सीसमोर, शिवम सोसायटीसमोर, सहा आसनी रिक्षा वाहनतळाजवळ आदी ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. (वार्ताहर) ४चाकण शहरात मोक्याच्या ठिकाणी, चौकांमध्ये व विशेषत: पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग कायमस्वरूपी पाहायला मिळतात. आंबेठाण चौकाजवळील रोहकल फाट्यावरील कांडगेवस्ती, रोहकल फाट्यावर, तळ्याजवळ, वैशाली कॉम्प्लेक्ससमोर, महालक्ष्मी स्टील सेंटरच्या जवळील किराणा दुकानासमोर, कानपिळे पेट्रोलपंप ते वाघेवस्ती, गुडलक हॉटेल ते वास्तुश्री ट्रेडर्स, धाडगे मळ्याकडे जाणारा पूल ते वैशाली ढाबा, गोकूळ कॉम्प्लेक्ससमोर, चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळा, शिक्रापूर रोडवर माणिक चौक, विशाल गार्डनसमोर, पानसरे मळा अशा महामार्गावर असणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याची ढीग पडलेले आहेत.आरोग्याचा प्रश्नकचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणावर हॉटेलमधील शिळे खाद्यान्न, भाज्या, प्लॅस्टिक, केशकर्तनालयातील केस, मोकळ्या बाटल्या, हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारानंतरच्या टाकावू वस्तू, खराब झालेल्या फळभाज्या व पालेभाज्या आदींचा समावेश असतो. या ठिकाणाहून जाताना नागरिक अक्षरश: नाकाला रुमाल लावून जातात.