शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कळंब, वालचंदनगरवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री ...

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटात भाजपने दोन ग्रामपंचायतीवर बाजी मारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा तर लागली नाही ना, असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग एकमधून भाजपच्या कुसूम सर्जेराव कोळी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आप्पासाहेब डोंबाळे, शितल सागर कोळी यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कल्याण डोंबाळे तर भाजपचे अर्चना पोपट चव्हाण व भामा दादा भालेराव, हे निवडून आले आहेत. प्रभाग तीनमधून सारिका ज्ञानदेव मेटकरी व विद्या अतुल सावंत हे दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र शिवराम कदम, तर भाजपचे, परविन इकबाल शेख व डॉ.अनिता नंदकुमार सोनवणे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे प्रमोद विश्वावसराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे, संदीप मधुकर पाटील, सोनाली प्रमोद खंडागळे,निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे अश्विनी अभिजीत नलवडे, लक्ष्मण जगन्नाथ पालवे, सुनील बाबू मोरे हे निवडून आले असल्याने, कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर भाजपच्या ९ जागा निवडून आल्या असल्याने, कळंब ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचे हर्षवर्धन अर्जुन गायकवाड तर भाजपचे, संदीप गुणवंत पांढरे, राष्ट्रवादी

काँग्रेसच्या वैशाली पोपट मिसाळ, प्रभाग २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण किसनराव वीर, भाजपचे मनिषा सत्यशिल पाटील, स्वाती सचिन अचलारे निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास भानुदास शेळके, प्राजक्ता विनोद कांबळे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे संजय सुरेश नकाते, रोहित जगन्नाथ झेंडे व अनिता संतोष गायकवाड निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे संतोष नामदेव गायकवाड, पद्मावती जनार्दन परीट, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशाली शरद शिवशरण निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या आरती दयानंद झेंडे निवडून आल्या आहेत, तर भाजपच्या शरद श्रीहरी गायकवाड व महादेवी रायप्पाकोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.