शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

ऐतिहासिक सिनेमांसाठी किमान अभ्यास तरी करावा- विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 6:09 PM

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त चर्चासत्र...

पुणे : ‘मी पानिपत कादंबरी लिहायला पाच वर्षे घेतली. मात्र, त्यावरचा सिनेमा अवघ्या ११ महिन्यांत तयार झाला, मग सिनेमा चालणार कसा? बजेट मिळालं की बनवा सिनेमा असं करून चालणार नाही, त्यासाठी किमान वेळ देणे गरजेचे आहे. 'मुघल ए आझम'ची निर्मिती १२ वर्षे चालली होती. आपण ऐतिहासिक सिनेमा करताना किमान दोन-तीन वर्षे तरी अभ्यास करायला हवा’, असे मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात 'इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये पाटील, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे हे सहभागी होते. त्यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

विश्वास पाटील म्हणाले, आज ऐतिहासिक सिनेमाची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही. महाभारत आणि रामायण मालिका आल्या, त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्यांचे लेखक हे प्रतिभावान होते. यामुळे पडद्यावर आलेले चित्रण लोकांना भावले. आज आपल्याकडे घाईत काम करायची सवय लागली आहे. परिणामी, दोन वर्षांपूर्वी ज्या दिग्दर्शकांचे कौतुक झाले, आज त्याची छी-थू होतेय ती याच कारणांमुळे. शेवटी एवढेच म्हणेन की, पेराल तसे उगवते, हे सत्य नाकारता येणार नाही.

दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे म्हणाले, आजघडीला मोठा सिनेमा बनवणे आणि चालवणे हे मोठे आव्हान आहे. कारण पायरसी रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान निर्मात्यांपुढे आहे. ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर म्हणाले, आज मराठी चित्रपटांचे भवितव्य अवघड दिसतंय. कारण पहिल्या दिवशीही प्रेक्षक येत नाहीत. ऐतिहासिक चित्रपट वाढल्याने मराठी चित्रपटांची संख्यात्मक नाही मात्र दर्जात्मक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Panipat MovieपानिपतVishwash Patilविश्वास पाटील PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर