शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त पाण्यामुळे क्षारपड जमिनींचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: August 6, 2015 03:39 IST

पिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा

रविकिरण सासवडे, बारामतीपिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा धोकाही अधिक आहे. मात्र, बागायती क्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी पिकाला अतिरिक्त पाणी देत आहेत. बारामती तालुक्यातच या अतिरिक्त पाणीवापरामुळे अंदाजे साडेतीन ते चार हजार क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यामुळे जलसाक्षरता आणि जलनियंत्रणाच्या चळवळी व्यापक प्रमाणावर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षीच पाऊसकाळ लांबत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनस्तरावरून जलयुक्त शिवारसारख्या योजना लोकसहभागातून राबवल्या जात आहेत. पाणी साठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच पाण्याच्या वापरावरही योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गावपातळीपासून जलयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद मिळत आहे. जलस्रोत बळकटीकरणाला त्यामुळे चालना मिळाली. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब साठवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याबरोबरच पाणी वापरतानादेखील थेंबाचाही विचार करण्याची गरज आहे. उसासारख्या पिकाला एकरी एकावेळी पाटाद्वारे १० ते १२ लाख लिटर पाणी लागते. तर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास २६ ते २७ हजार लिटर पाणी लागते. मात्र, शेतकरी पाणी आहे म्हणून ठिबकने देखील अतिरिक्त पाणी देत आहेत. पिकांची गरज ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाणीवापराबाबत काटेकोर नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे जमिनीची स्थिती, पाण्याची उपलब्धता, हवामान याचा विचार करता पीक पद्धती ठरवण्याची गरज आहे.