शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

Chiplun Flood: “राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय?” संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 4:18 PM

Chiplun Flood: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली.

मुंबई: कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हजारो कुटुंबाना बसला आहे. दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी महाड येथील तिळये गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर गेले होते. मात्र, भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबत भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली. (sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari over konkan floods visit) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोकणातील पूरस्थितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महाडनंतर चिपळूण येथील बाजारपेठेला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले आमदार आशीष शेलार होते. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यटघटनेनुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांचे निलंबन झाले आहे. विधिमंडळात आमदारांनी घातलेला गोंधळ आणि केलेली दंगल, तसेच त्यांचे राजदंडाला हात घालणे हे वर्तन घटनाबाह्यच होते आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ राज्यपाल कोश्यारी हे विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत, असे दिसत आहे. विधानसभेचे अस्तित्व आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार जर राज्यपाल मानतच नसतील, तर आता या संदर्भात सरकार काय करते हे पाहावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”

दरम्यान, राज्यपाल भतगसिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारण