शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

Chiplun Flood: “राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय?” संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:20 IST

Chiplun Flood: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली.

मुंबई: कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हजारो कुटुंबाना बसला आहे. दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी महाड येथील तिळये गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर गेले होते. मात्र, भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबत भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली. (sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari over konkan floods visit) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोकणातील पूरस्थितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महाडनंतर चिपळूण येथील बाजारपेठेला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले आमदार आशीष शेलार होते. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यटघटनेनुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांचे निलंबन झाले आहे. विधिमंडळात आमदारांनी घातलेला गोंधळ आणि केलेली दंगल, तसेच त्यांचे राजदंडाला हात घालणे हे वर्तन घटनाबाह्यच होते आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ राज्यपाल कोश्यारी हे विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत, असे दिसत आहे. विधानसभेचे अस्तित्व आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार जर राज्यपाल मानतच नसतील, तर आता या संदर्भात सरकार काय करते हे पाहावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”

दरम्यान, राज्यपाल भतगसिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
 

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारण