शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

"नितीश कुमारांची खुर्ची जाणार, १५ ऑगस्टला तेजस्वी यादव तिरंगा फडकवणार", आमदाराच्या विधानाने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 4:18 PM

Nitish Kumar Government in Bihar: एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पाटणा - एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे बिहारमधल राजकारणात खळबळ उडाली आहे. (RJD MLA Bhai Virendra Says, Nitish Kumar to step down & Tejashwi Yadav will hoist the flag as CM on 15 august)

येत्या १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून गांधी मैदानात तिरंगा फडकवतील, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी केले आहे. एकीकडे बिहारमध्ये सत्तेत असलेल्या एनडीएमधील जनता दल युनायटेड, भाजपा, हम आणि व्हीआयपी या घटक पक्षांमध्ये एकमत दिसत नसतानाच आता भाई वीरेंद्र यांच्या विधानाने एनडीएमध्ये अधिकच चलबिचल होण्याची शक्यता आहे.

आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी एनडीएमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख खेला असा केला आहे. या खेलामुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचे सरकार पडार आहे. तसेच स्वातंत्र दिनी १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून तिरंगा फडकवणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

सध्या बिहारमध्ये जातीय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. तर व्हीआयपीचे मुकेश सहानी हे सुद्धा भाजपावर नाराज आहेत. मुकेश सहानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये फुलन देवी यांची मूर्ती स्थापन करायची होती. तसेच येत्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्येही अधिकाधिक उमेदवार उभे करून अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीलाही मुकेश सहानी अनुपस्थित होते. मात्र मंगळवारी त्यांचा पवित्रा काहीसा मवाळ झाला होता. त्यांनी नितीश कुमार सरकारबाबत आपली काहीही नाराजी नसल्याचे सांगितले होते. तसेच एनडीएबाबत ज्या काही समस्या आहेत त्याही दूर केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

बिहारमधील या राजकीय घडामोडींदरम्यान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहनवाझ हुसेन यांची भेट घेतली होती. या दोघांदरम्यान, दीर्घकाळ चर्चा झाली होती. मात्र बिहारमधील हम आणि व्हीआयपी हे दोन छोटे पक्ष नितीश कुमार यांच्या सरकारचा टेकू काढून घेतात की सरकारसोबत राहतात, हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारPoliticsराजकारण