शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"नितीश कुमारांची खुर्ची जाणार, १५ ऑगस्टला तेजस्वी यादव तिरंगा फडकवणार", आमदाराच्या विधानाने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 16:19 IST

Nitish Kumar Government in Bihar: एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पाटणा - एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे बिहारमधल राजकारणात खळबळ उडाली आहे. (RJD MLA Bhai Virendra Says, Nitish Kumar to step down & Tejashwi Yadav will hoist the flag as CM on 15 august)

येत्या १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून गांधी मैदानात तिरंगा फडकवतील, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी केले आहे. एकीकडे बिहारमध्ये सत्तेत असलेल्या एनडीएमधील जनता दल युनायटेड, भाजपा, हम आणि व्हीआयपी या घटक पक्षांमध्ये एकमत दिसत नसतानाच आता भाई वीरेंद्र यांच्या विधानाने एनडीएमध्ये अधिकच चलबिचल होण्याची शक्यता आहे.

आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी एनडीएमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख खेला असा केला आहे. या खेलामुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचे सरकार पडार आहे. तसेच स्वातंत्र दिनी १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून तिरंगा फडकवणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

सध्या बिहारमध्ये जातीय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. तर व्हीआयपीचे मुकेश सहानी हे सुद्धा भाजपावर नाराज आहेत. मुकेश सहानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये फुलन देवी यांची मूर्ती स्थापन करायची होती. तसेच येत्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्येही अधिकाधिक उमेदवार उभे करून अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीलाही मुकेश सहानी अनुपस्थित होते. मात्र मंगळवारी त्यांचा पवित्रा काहीसा मवाळ झाला होता. त्यांनी नितीश कुमार सरकारबाबत आपली काहीही नाराजी नसल्याचे सांगितले होते. तसेच एनडीएबाबत ज्या काही समस्या आहेत त्याही दूर केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

बिहारमधील या राजकीय घडामोडींदरम्यान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहनवाझ हुसेन यांची भेट घेतली होती. या दोघांदरम्यान, दीर्घकाळ चर्चा झाली होती. मात्र बिहारमधील हम आणि व्हीआयपी हे दोन छोटे पक्ष नितीश कुमार यांच्या सरकारचा टेकू काढून घेतात की सरकारसोबत राहतात, हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारPoliticsराजकारण