शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा

By मोरेश्वर येरम | Published: January 21, 2021 4:46 PM

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे"

ठळक मुद्देजयंत पाटील यांनी केला 'त्या' विधानाबाबतचा खुलासाप्रसारमाध्यमांकडून चुकीच्या पद्धतीनं विधान चालवलं जात असल्याचं पाटील म्हणालेमुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानावर अखेर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या इच्छेबाबतच्या  राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विधानावरुन सद्या जोरदार चर्चा सुरु असतानाच खुद्द जयंत पाटील यांनीच याबाबतचा सविस्तर खुलासा केला आहे. 

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. माझं व्हर्जन जे आहे  ते लोकमतमध्ये व्यवस्थित देण्यात आलं आहे. ते मी ट्विटही केलं आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केल्याचं वृत्त आज सकाळपासून माध्यमांमध्ये सुरू होतं. भाजप नेत्यांकडूनही जयंत पाटील यांच्या विधानावर टीका करण्यात आली. भाजप नेते अतुल भातळखकर यांनी 'आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत', असा टोला लगावला होता. आता खुद्द जयंत पाटील यांनी अशाप्रकारचं कोणताही विधान केलं नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विटही केलं आहे.  

"इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती", असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं. ट्विटसोबतच पाटील यांनी 'लोकमत'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटोही ट्विट केला आहे.

जयंत पाटील मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही", असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर पाटील म्हणाले, "माझी इच्छा असणारच ना...प्रत्येक राजकारणाऱ्याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा सगळ्यांनाच असते. मला वाटतं की इतक्या दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा माझ्यापेक्षा मतदारांनाही इच्छा असू शकते. परंतु परिस्थिती, सध्याची संख्या पाहता आमचे ५४ आमदार आहेत. त्यात मला वाटत नाही शक्य होईल. आमचा पक्ष वाढला पाहिजे", असं जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण