शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Maratha Reservation :"मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, गरज भासल्यास…” मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 9:40 PM

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देआता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय विश्वात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे घटनाबाह्य ठरवत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये निराशेचे वातावरण असून, मराठा समजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे. ( CM Uddhav Thackeray Says "will send a letter to the Prime Minister & President for Maratha reservation")

जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठीच्या पुढील लढाईबाबतही मार्गदर्शन केले आहे. आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मी सकाळी दिलेल्या निवेदनामधून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. मात्र आता आरक्षणाच्या या मागणीसाठी मी उद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहे. तसेच गरज भासल्यास आरक्षणाच्या या मुद्द्यावर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेईन.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली होती. तशी हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी. यापूर्वीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही निर्णय संसदेमधून बदलले गेले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने जास्त वेळ न घालवता मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

दरम्यान, मराठा आरक्षणााबाबत सर्वोच्च न्यायालाने दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे. मी त्यासाठी मराठा समाजाचे आभार मानतो. सध्या आपण  कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर  उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच संयम दाखवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी