या फोटोतील महिला नेत्याला ओळखलं का? केला होतां आतंरजातीय विवाह, फारच रंजक आहे प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:13 PM2022-02-15T13:13:49+5:302022-02-15T13:20:09+5:30

सुषमा स्वराज यांची केवळ स्वतःची प्रेम कथा चर्चेत राहिली नाही, तर त्यांनी अनेक जोडप्यांची मदतही केली. माजी परराष्ट्रमंत्री  (Former Minister of External Affairs) सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अशाच काही रंजक कथांबद्दल जाणून घेऊया.

love story and interesting facts about Sushma Swaraj | या फोटोतील महिला नेत्याला ओळखलं का? केला होतां आतंरजातीय विवाह, फारच रंजक आहे प्रेमकहाणी

या फोटोतील महिला नेत्याला ओळखलं का? केला होतां आतंरजातीय विवाह, फारच रंजक आहे प्रेमकहाणी

Next

भारतातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) असणाऱ्या पहिल्या महिला सुषमा स्वराज (Sushma Swaraj Birthday) यांचा जन्म व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day 2021) दिवशी झाला, सुषमा स्वराज यांची केवळ स्वतःची प्रेम कथा चर्चेत राहिली नाही, तर त्यांनी अनेक जोडप्यांची मदतही केली. माजी परराष्ट्रमंत्री  (Former Minister of External Affairs) सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अशाच काही रंजक कथांबद्दल जाणून घेऊया.

जेव्हा अंतरधर्मीय विवाहात आली अडचण
गोष्ट लखनऊच्या एक जोडप्याची आहे. दोघंही वेगवेगळ्या धर्माचे होते, म्हणून पासपोर्ट अधिकारी त्यांच्या पासपोर्टमध्ये अडथळा आणत होता तसंच महिलेला चुकीची वागणूक दिली जात होती. ही बाब चर्चेत येताच काही कार्यकर्तेही उभे राहिले आणि पासपोर्ट अधिकाऱ्याच्या बाजूने जोरदार आवाज उठवत आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यास पासपोर्ट न देण्यास सांगितलं. अशात पीडितेनं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्वीटरच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली. यानंतर संपूर्ण परराष्ट्र मंत्रालय या जोडप्याच्या बाजूनं उभं राहिलं आणि प्रकरण मार्गी लावलं. यानंतर सुषमा स्वराज सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. मात्र, त्यांनी ट्रोलर्सला कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं.

आणखी एक किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. लखनऊमधील नकी अली खान पाकिस्तानातील एक मुलगी सबाहत फातिमा हिच्यासोबत विवाह करू इच्छित होते. मात्र, व्हिजासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. तेव्हा नकी अलीनं थेट सुषमा स्वराज यांच्यापुढे आपली अडचण मांडली आणि स्वराज यांनी पुन्हा एकदा प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत जोडप्याला मोठी मदत केली. त्यावेळी पेशानं इंजिनिअर असलेले नकी अली लखनऊमधील होते तर फातिमा कराचीची रहिवासी होती. दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि दोघांचे कुटुंबीयही त्यांना ओळखत होते. मात्र, भारत फाळणीच्या वेळी ही कुटुंबे वेगळी झाली होती. सुषमा यांच्या मदतीनंतर या दोघांचा विवाह ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांनी करून दिला होता.

पाकिस्तानी मुलगी अशी पोहोचली भारतात
परराष्ट्रमंत्री असताना सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करत सामान्य लोकांसोबत जोडलं जाण्याचं एक साधन म्हणून याकडे पाहिलं होतं. अनेकांनी तर असंही म्हणण्यास सुरूवात केली होती परराष्ट्र मंत्रालय ट्वीटरवर चालतं. सुषमा यांनी सोशल मीडियावरून संवाद साधत अनेकांची मदत केली होती. याचाच आणखी एक रंजक किस्सा आहे.

पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी असलेली २५ वर्षीय सादिया लखनऊच्या २८ वर्षीय सैयद शारिक हाश्मीच्या प्रेमात पडली होती आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा सादियाला भारतात येऊन लग्न करण्यासाठी व्हिजाची समस्या उभी ठाकली. या परिस्थितीतही सुषमा स्वराज यांनीच या प्रेम कथेची नाव पार करून दिली आणि सादियाला लग्नासाठी भारतात येण्याची परवानगी मिळाली.

सुषमा यांची प्रेम कथाही होती रंजक
गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, गुलाबाचं फुल काट्याच्या मध्ये फुलतं. याचप्रकारे, सुषमा स्वराज यांची प्रेम कथा आणीबाणीच्या काळात रंगात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करताच एकीकडे जेपीचं आंदोलन तर दुसरीकडे गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन तीव्र झालं.

अशा परिस्थितीत ABVPच्या विद्यार्थी नेत्या असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली होती. याच काळात सुषमा स्वराज यांची सहकारी वकील स्वराज कौशल यांच्यासोबत जवळीक वाढली.  स्वराज कौशल हे समाजवादी नेते म्हणून उदयात आलेल्या जॉर्ज फर्नांडिज यांचे निकटवर्तीय होते. जॉर्ज रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी कामगार नेता म्हणून आपला एक ठसा उमटवला होता.

इंदिरा गांधी सरकारने जॉर्जवर असा आरोप केला, की ते सरकारी इमारती आणि रेल्वे मालमत्ता नष्ट करण्यासाठीच्या डायनामाइट वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करीत आहेत. त्यानंतर स्वराज कौशल यांनी जॉर्ज यांची केस लढवली. २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाली आणि समाजवाद आणि जॉर्जच्या बाजूनं लढत असलेल्या सुषमा आणि कौशल यांनी त्याच वर्षी १३ जुलै रोजी लग्न केले. असं म्हटलं जातं, की या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर घरच्यांना मनवून लग्न केलं. लग्नानंतर दोनच वर्षात सुषमा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. कपाळावर मोठी टिकली आणि भांगामध्ये कुंकू भरणाऱ्या सुषमा स्वराज यांची प्रेम कथा प्रत्येकाला लक्षात राहिल अशीच आहे.

Web Title: love story and interesting facts about Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.