शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News : "लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 1:53 PM

CoronaVirus Yogi Adityanath Government And BJP : राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. 

लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कायदेमंत्री बृजेश पाठक हे राज्य सरकारला पत्र लिहिणारे पहिले निर्वाचित सदस्य होते. त्यांनी आपल्या पत्रात लखनऊ प्रशासनाच्या कारभारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. बेड, ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यानं लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. तसेच मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनीही अनेकदा परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचं सांगत त्यांनी सरकारी रुग्णालयांत स्वत: लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. 

"उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू"

कौशल किशोर यांनी निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, त्याचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल पत्रं लिहून कळवलं होतं. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी नकार देत आहेत आणि रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. आठवड्याच्या सुरुवातीला औराई, भदोहीचे भाजपा आमदार दीनानाथ भास्कर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. भदोहीच्या भाजपा जिल्हा सचिवांची कोरोना संबंधीत मृत्यूच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाDeathमृत्यू