शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘रेड्याला रेडकू झालं ते आमच्यामुळे; वाळवंटात हरभरा आला तो आमच्यामुळे’; धारावीच्या श्रेयवादावरून भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 13:03 IST

Coronavirus in Dharavi : धारावीतील यशाचं श्रेय सरकारचं नाहीच, असं म्हणणाऱ्या भाजपाला शिवसेनेनं मुखपत्रातून खोचक टोला हाणला आहे.

मुंबईः आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं होतं. परंतु, धारावीमध्ये झालेलं काम, कोरोना नियंत्रणासाठी झालेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांची दखल थेट जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलीय आणि या ‘धारावी पॅटर्न’चं कौतुकही केलंय. ही महाराष्ट्रासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे, पण त्यावरून आता श्रेयवादाचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. धारावीतील यशाचं श्रेय सरकारचं नाहीच, असं म्हणणाऱ्या भाजपाला शिवसेनेनं मुखपत्रातून खोचक टोला हाणला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत अहोरात्र काम केलं. त्यांचा कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देणं हे या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे, अशी टिप्पणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी डब्ल्यूएचओलाही टॅग केलं होतं. त्यानंतर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काही फोटो शेअर केले. 800 संघ स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नेत्यांच्या या विधानांचा समाचार ‘सामना’च्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.

''धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!'' असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?, असा ‘रोखठोक’ सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘‘संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही?’’, अशी विचारणाही त्यांनी केलीय.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे. आता प्रवचनं नकोत. सगळ्या नकारात्मक परिणामांमधून जनतेची सुटका कशी होईल, तेवढंच सांगा साहेब, असा टोमणा अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना मारला आहे.

केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे कोरोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेश 'मॉडेल'वर पुन्हा कडक लॉक डाऊन लादण्याची वेळ यावी याचा अर्थ काहीतरी चुकले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यामुळे भाजपास हे राज्यसुद्धा कोरोनासंदर्भात महत्त्वाचे आहे, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेनेनं केलीय.

दरम्यान, धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं असून त्याबद्दल शाबासकीही दिली आहे. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की, कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणं इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात. मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे, अशी दाद डब्ल्यूएचओनं दिली आहे.

संबंधित बातम्याः 

साहेब, प्रवचनं नकोत, जनतेची कोरोनातून सुटका कशी होईल तेवढंच सांगा; ‘जुन्या मित्रा’चा फडणवीसांना चिमटा

शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

''धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात''

'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय"

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे