शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 9:54 PM

Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने कोरोनाचा फैलाव, लसीकरण, इंधनदरवाढ यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिव्याखाली अंधार, समजलं तर बरं आहे, असा टोला स्मृति इराणी यांनी राहुल गांधींना नाव न घेता लगावला आहे. (bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism)

केंद्रातील मोदी सरकारच्या लसीकरण मोहिमेवर राहुल गांधींनी श्वेतपत्रिका काढत टीका केली. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पलटवार केला आहे. ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे, या शब्दांत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे

सर्वाधिक मृत्यूदर असणारी काँग्रेसशासित राज्य

कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि कोरोना बळी आहेत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेसशासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधी आवाज उठत असून, त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका इराणी यांनी केली आहे. 

लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केले? काँग्रेसने, अशी टीकाही स्मृति इराणी यांनी केली आहे. तसेच “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असा खोचक टोलाही इराणी यांनी लगावला आहे.

फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही कारण त्यांचे सगळे लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीPoliticsराजकारण