शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: सीताराम कुंटे आणि जयंत पाटील यांच्यात वादावादी?, अजित पवार म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:18 IST

Ajit Pawar: राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून काही आक्षेप असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar comment on argument between Sitaram Kunte and Jayant Patil )

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केलं होतं.  जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्यानं बैठकीत उपस्थित मंत्री चकित झालं होते. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते. याचबाबत अजित पवार यांनी विचारण्यात आलं असता त्यांनी कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

"राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणताही वाद असण्याचं कारण नाही. जयंत पाटील हे अतिशय शांत स्वभावाचे आहेत. उलट मी त्यांच्यापेक्षा तापड स्वभावाचा आहे. अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील आणि योग्य त्या सूचना करण्यात येतील", असं अजित पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढवा घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यात लसीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी जोर दिला. 

देशात सर्व नागरिकांसाठी लस गरजेची आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याचंही दिसून आलं आहे. पण लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. १० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी सुरूराज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुशंगानं पुण्यातही तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ऑक्सिजनबाबतची राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आता १८०० ने वाढवायची आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी याआधीच सुरू करण्यात आली आहे. 

भारत बायोटेकने जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली ती देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तो प्रकल्प सुरू होण्यासाठी तीन महिने लागतील. तिथे तयार होणारी लस निम्मी केंद्राला द्यावी लागेल, पण राहिलेली लस महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, असा आग्रह अजित पवार यांनी केला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटील