शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा कारभार स्मार्ट कधी होणार?

By admin | Updated: August 3, 2015 04:17 IST

बे स्ट सिटीचा बहुमान मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. मात्र, प्रकल्पांची वेळेवर न

बे स्ट सिटीचा बहुमान मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. मात्र, प्रकल्पांची वेळेवर न होणारी कामे, विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची होणारी लूट, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नसलेला वचक आणि विविध साहित्य खरेदी, प्रकल्पांत दिवसेंदिवस वाढणारा भ्रष्टाचार, कोणाचाही वचक नसणारा कारभार स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित आहे. लौकिक टिकविण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी स्मार्ट होणाची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या वतीने जेएनएनयूआरएमसारख्या योजना शहरी गरिबांसाठी गृहनिर्माण, बीआरटीएस, उड्डाणपुलांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविल्याने शहरास नवा चेहरा मिळाला. वेगाने विकास झाला. त्यामुळे गाव ते महानगर आणि बेस्ट सिटीपर्यंतची वाटचाल सुकर झाली. मेट्रो, रिंग रोडसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत. भाजप-शिवसेना युती सरकारने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली, त्या वेळी राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश होणार का, या विषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. राजकारण झाल्यास स्मार्ट सिटीत समावेश होणार नाही, अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली. मात्र, गुणांच्या आधारे शहराचा समावेश या नव्या योजनेत झाला. ही शहराच्या दृष्टीने आनंददायी बाब आहे. या योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड असा एकत्रितपणे समावेश असल्याने मिळणाऱ्या हजार कोटींपैकी पिंपरी-चिंचवडला किती निधी मिळणार, याबाबत कोणतेही धोरण निश्चित झालेले नाही. एकत्रितपणे समावेश असला, तरी निधी हा पूर्णपणे मिळावा, अशी शहरवासीयांची मागणी आहे. स्मार्ट सिटीमुळे शहरातील रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा यंत्रणा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. स्मार्ट सिटीमुळे काय होणार, हा प्रश्न शहरवासियांना आहे. आपले शहर अधिकपणे स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.आता तरी कारभार सुधारायला हवा!स्मार्ट सिटीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडला ९२.५ गुण मिळाले. २४ तास पाणीपुरवठ्याचे न पूर्ण झालेले स्वप्न, अर्धवट असलेला बीआरटीएस मार्ग, शहरी गरिबांच्या घरकुलचे पूर्ण न झालेले स्वप्न, जेएनएनयूआरएमची वेळेवर न झालेली अंमलबजावणी यामुळे गुण कमी पडलेले आहेत. बीआरटीचा तीन वेळा उद्घाटन सोहळा जाहीर होऊनही एकही मार्ग सक्षमपणे सुरू झालेला नाही. अधिकारी व पदाधिकारी ठेकेदारांना का पोसताहेत, हा प्रश्न आहे. पर्यावरण विभागाच्या परवानग्या, प्राधिकरणाकडून वेळेवर जागेचे न झालेले हस्तांतर अशा प्रकारे नियोजनाचा असलेला अभाव यामुळे घरकुल योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे सव्वातेरा हजारांपैकी निम्म्याच लाभार्थींना घर मिळाले आहे. २४ तास पाणीपुरवठ्याचा दावा तर सोडाच; एक वेळही शहर कोणत्याही भागात पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही. नुसत्या योजना जाहीर करण्यापेक्षा त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. काम वेळेवर झाले नाही म्हणून एकाही ठेकेदाराला दंड केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच ठेकेदारांचे वाढीव खर्चाचे विषय बेमालूमपणे मंजूर केले जातात. हे कोठेतरी थांबविण्याची गरज आहे.एलबीटीमुळे अडचण वाढलीएलबीटीतून ११०० कोटींचे उत्पन्न महापालिकेस मिळते. बजेटपैकी हे उत्पन्न पन्नास टक्के आहे. ५० कोटींच्या पुढे उलाढाल असणाऱ्यांनाच आॅगस्टपासून एलबीटी असेल, असे राज्य सरकारने जाहीर केल्याने वर्षाला किमान सहाशे-सातशे कोटींचा फटका बसणार आहे. विकासकामे करताना, निधी खर्च करताना पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागायला हवे. निधीचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महापालिकेचा कारभार अधिक स्मार्ट करण्याची गरज आहे. - विश्वास मोरे