शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लघुउद्योजक हैराण

By admin | Updated: July 24, 2015 04:29 IST

एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे

पिंपरी : एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेळेत दखल घेतली जात नाही. समस्या निवारणासाठी सुरू केलेल्या ‘टोल फ्री’ क्रमांकामुळे समस्येत अधिक भर पडली आहे. टोल फ्री क्रमांकावरुन एसएमएस आल्याशिवाय दुरुस्ती करता येत नसल्याचे उत्तर देऊन वीज कर्मचारी हात झटकतात. त्यामुळे टोल फ्री क्रमांकाने समस्येत अधिक भर पडली आहे. वीज केंद्रास फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. अनेकदा फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. त्यामुळे संपर्कच करता येत नाही. टोल फ्रीचे केंद्र मुंबईत आहे. तो क्रमांक सतत बंद असतो. अनेकदा कॉल केल्यानंतर संपर्क होतो. कॉल सेंटरवरून संबंधित वीज केंद्राला एसएमएसद्वारे कळविले जाते. मात्र, अनेकदा त्यावर ठोस कारवार्ई केली जात नाही. या पद्धतीमुळे वेळ भरपूर जातो. जवळच केंद्र असताना टोल फ्रीला संपर्क करण्याची सक्ती केली जात असल्याने समस्या निवारणास अधिक वेळ जात आहे. त्यात येथील वीजजोडणी यंत्रणा आणि साहित्य ७ वर्षांपूर्वीचे आहे. ते कालबाह्य झाल्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.मनुष्यबळ कमी आहे. त्यातही कर्मचारी कंत्राटी असल्याने त्यांना कामाचे गांभीर्य आणि जबाबदारीची जाणीव नाही. या संदर्भात मुख्य कार्यालय, मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांकडे वारंवार तक्रार करूनही विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे लघुउद्योजक हैराण आहेत. वीज का केली, कधी येणार हे विचारल्यास ब्रेक डाऊन आहे. ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. केबल दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्ती काम सुरू आहे, अशी उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली जाते. जबाबदारी टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचा आधार कर्मचारी आणि अधिकारी वर्ग घेत असल्याने दुरुस्ती वेळेत होत नाही. त्यामुळे उद्योजकांना वीज खंडित होण्याचा फटका सहन करावा लागत आहे. भोसरी, चिंचवड, तळवडे, चिखली, कुदळवाडी, लांडेवाडी, थेरगाव, पिंपरी या भागात सुमारे ८ हजार लहान-मोठे लघुउद्योग आहेत. यावर लाखो जण अवलंबून आहेत. या भागात दोन महिन्यांपासून अचानक वीज गायब होत आहे. दिवसांतून २ ते ४ वेळा वीज ये-जा होण्याचा लपंडावच सुरू आहे. एकदा वीज गेल्यास ती ५ मिनिटांत येते किंवा २ ते ३ तासांनी येते. कधी कधी दुसरा दिवस उजाडतो. अचानक वीज गेल्याने यंत्रे बंद पडतात. त्यामुळे कामगारांना कामाविना बसून राहावे लागते. या संदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष नितीन बनकर यांनी सांगितले, ‘‘एमआयडीसी भागातील विजेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्यामुळे वारंवार वीज जाते. त्याचा फॉल्ट लवकर समजत नसल्याने दुरुस्ती वेळेत होत नाही. मनुष्यबळ कमी असल्याचे रडगाणे कायम सांगितले जाते. टोल फ्री क्रमांक देऊन या समस्येत भर घातली आहे. नेहमीच वीज जात असल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. उत्पादनात घट होत आहे. नाईलाजास्तव हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.’’तळवडे येथील लघुउद्योजक नीरज मंत्री यांनी सांगितले, ‘‘वीज कधी जाते, तर कधी जात नाही. वीज गेल्यास ती परत कधी येईल, हे सांगता येत नाही. वीज दिवसातून ५ ते ६ वेळा जाते. वीज केंद्राकडे तक्रार केल्यास कोणी जबाबदारी घेत नाही. अनेकदा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. वारंवार वीज जात असल्याने वैताग आला आहे.’’भोसरी व तळवडे येथील लघुउद्योजक शिवाजी साखरे यांनी सांगितले, ‘‘वीज सतत जात असल्याने कंपन्यांचे आॅर्डर वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे कंपन्यांचा दबाव वाढत आहे. त्यात कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. भरमसाट बिल न चुकता येते. मंदीच्या काळात तग धरून, कर्ज काढून उद्योग चालवीत आहेत. कामगारांचा पगार देणेही अनेकदा अवघड होऊन बसते. लघुउद्योजक डबघाईला आला आहे.’’ (प्रतिनिधी)