'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:30 IST2025-11-19T18:29:25+5:302025-11-19T18:30:09+5:30

वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे

36 deaths in 11 months in IT Park, which has become an 'accident zone'; Intrusion of heavy vehicles has increased | 'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

पिंपरी : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात वाढत्या अपघातांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे. यात भर म्हणून, प्रवेशबंदीच्या वेळेतही जड-अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, मागील ११ महिन्यांत हिंजवडी आणि वाकड परिसरात झालेल्या अपघातांमध्ये ३६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गुन्हे आणि दंडवसुली

वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५९ हजार १९६ जड, अवजड वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईतून सहा कोटी ६७ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

आरएमसी प्रकल्प चालकांना नोटीस

वाढते अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. बंदीच्या वेळेत जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही यासाठी परिसरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प चालक आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीची कारणे

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये १३० हून अधिक नामांकित कंपन्या असून, दररोज तीन ते चार लाख नागरिक येथून ये-जा करतात. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. आयटी अभियंते हिंजवडीसह वाकड, रावेत, पुनावळे, ताथवडे परिसरात राहत असल्याने या भागांत मोठ-मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या आरएमसी प्रकल्पांची संख्याही अधिक आहे, ज्यामुळे बांधकाम साहित्याची जड वाहतूक वाढली आहे.

हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, परिसरात वाहनतळाची व्यवस्था नाही, त्यामुळे वाहने रस्त्यावरच थांबतात. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून आणि महामेट्रोचे काम संपल्यावर राडारोडा (कचरा) तत्काळ हटवणे आवश्यक आहे.

वाकड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक मधुकर थोरात यांनी माहिती दिली की, सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही चालक नियम मोडत आहेत. यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

विभागनिहाय आकडेवारी (१ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२५)

विभाग          अपघातांची संख्या                  मृत्यू          बंदी उल्लंघन गुन्हे              वसूल केलेला दंड (रुपयांमध्ये)
हिंजवडी         ५८                                     १५            ५३,२१८                         ५ कोटी ९४ लाख ५३ हजार ६५०
वाकड           ७१ (३१ ऑक्टो. २०२५ पर्यंत)   २१            ५,९७७                           ७३ लाख ६ हजार ८५०

Web Title : हिंजवडी आईटी पार्क: दुर्घटना क्षेत्र, 11 महीनों में 36 मौतें

Web Summary : हिंजवडी आईटी पार्क में दुर्घटना दर चिंताजनक है। यातायात, खराब सड़कों और भारी वाहन उल्लंघन के कारण 11 महीनों में 36 मौतें हुईं। पुलिस ने उल्लंघनकर्ताओं पर भारी जुर्माना लगाया, और अधिकारी दुर्घटनाओं को रोकने के लिए निर्माण व्यवसायों को नोटिस जारी कर रहे हैं।

Web Title : Hinjewadi IT Park: Accident Zone, 36 Deaths in 11 Months

Web Summary : Hinjewadi IT Park's accident rate is alarming. 36 deaths occurred in 11 months due to traffic, poor roads, and heavy vehicle violations. Police fined violators heavily, and officials are issuing notices to construction businesses to curb accidents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.